शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने घेतले एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST

अशोक इंगळे साखरखेर्डा - पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून येथील एका शेतकऱ्याने एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन ...

अशोक इंगळे

साखरखेर्डा - पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून येथील एका शेतकऱ्याने एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन सेंद्रिय शेती फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. सेंद्रिय शेती पद्धतीतून जास्त उत्पादन घेता येत नाही, हा समज त्यांनी खोडून काढला आहे. त्यांनी केलेला सेंद्रिय शेतीचा अवलंब इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

साखरखेर्डा परिसरात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका, संकरित ज्वारी ही पिके घेतली जातात. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मातेरे झाले. कापसाच्या वाती झाल्या, मूग सडला, अशा परिस्थितीत खचून न जाता शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीकरिता कंबर कसली. मागील शासनाच्या काळात या भागात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिंचनाची अनेक कामे झाली. जमिनीत जलसाठा वाढला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने गहू, हरभरा या पिकांचे नियोजन शेतकऱ्यांनी केले. साखरखेर्डा येथील कुवरसिंग मोहने हे पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे संचालक म्हणून काम पाहतात. जैविक शेती मिशनचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल, यासाठी त्यांनी साखरखेर्डा येथे कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. ज्यांना जैविक शेतीचे नियोजन कळले त्यांनी त्या पद्धतीने शेती केली आणि पहिल्याच प्रयोगात यशही मिळाले.

साखरखेर्डा येथील हरीश सुधाकर देशपांडे यांनी आठ एकर शेतात सोयाबीननंतर गहू घेण्यासाठी शेतीची मशागत केली.

येथील हरीश देशपांडे यांनी पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून आठ एकरात गव्हाची पेरणी केली. रासायनिक खतांचा एकही मात्रा न वापरता शेणखत, जिवामृत यांचा वापर करून पेरणी केली. गव्हाची वाढही चार फुटांपेक्षा जास्त झाली. ९ नोव्हेंबर रोजी पेरणी केल्यानंतर चार वेळा पाणी, निंदन असा एकरी तीन हजार रुपये खर्च त्यांना आला. बन्सी जातीचा गहू असल्याने आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्याने या गव्हाची मागणी जास्त असते. आज ४० ते ४५ रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करून पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी पाठवितात. आज एकरी १२ क्विंटल उत्पादन घेऊन ४ हजार ५०० प्रति क्विंटल भाव मिळाल्याने त्यांना ८ एकरात ४ लाख ३२ हजारांचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती मिशनच्या माध्यमातून शेती किती फायद्याची आहे हे लक्षात येते.

..........प्रतिक्रिया.........

सेंद्रिय खत आणि १२ वनस्पतींपासून बनविलेल्या कीटकनाशकाची फवारणी केली तर कोणतेही कीटक त्या पिकावर आक्रमण करू शकत नाही. या गव्हाची पोळी आरोग्याला पोषक असते. संपूर्ण नैसर्गिक वातावरण असल्याने जमिनीचा पोतही सुधारतो.

-समाधान वाघ,

कृषी सहायक, साखरखेर्डा.

............प्रतिक्रिया..............

पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून मी शेती केली. त्याचा फायदा मला झाला. हीच पद्धत इतर शेतकऱ्यांनी राबविली तर शेतकरी समृद्ध होईल.

-हरीश सुधाकर देशपांडे,

आदर्श शेतकरी, साखरखेर्डा.

फोटो : हरीश सुधाकर देशपांडे यांनी पेरलेला गहू.