शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

देशात आणि राज्यात ‘विकृत’ सत्तेत : प्रा. ज्ञानेश वाकुडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:48 AM

खामगाव: केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्यांनी जनतेची ओरबडणूक चालविली असून, संघटीत धोकेबाजी करीत शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या भावनांशी खेळणारे सत्ताधारी टपोरी आणि विकृत असल्याचा सणसणाटी आरोप लोकजागर इंडियाचे प्रणेते   प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे केला.

ठळक मुद्देलोकजागर इंडिया विधानसभेच्या २८८ जागा लढविणार!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्यांनी जनतेची ओरबडणूक चालविली असून, संघटीत धोकेबाजी करीत शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या भावनांशी खेळणारे सत्ताधारी टपोरी आणि विकृत असल्याचा सणसणाटी आरोप लोकजागर इंडियाचे प्रणेते  प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे केला.खामगाव येथील पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत गुरुवारी ११ जानेवारी रोजी  प्रा. वाकुडकर यांनी लोकजागर इंडियाची भूमिका स्पष्ट केली. केंद्र आणि राज्य शासनावर सडकून टीका करताना ते म्हणाले की, देशात आणि राज्यात पूर्वी काँग्रेसच्या -राष्ट्रवादीच्या माध्यमातून  भ्रष्ट आणि बेफिकीरांचे राज्य होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळलेल्या जनतेने पर्याय म्हणून मोदी-फडणवीस म्हणजेच भाजपला निवडूण दिले. मात्र, भाजपने शेतकरी, कष्टकरी आणि जनतेचा भ्रमनिराश केला आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला छुपा अतिरेकी अंजेडा उघडपणे राबविला आहे. परिणामी, मोदींमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार मोठे नुकसानही झाले आहे. शेतकरी, कष्टकर्‍यांसोबतच ओबीसी विद्यार्थीही शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आले असल्याचेही वाकुडकर म्हणाले.  यावेळी सध्या सत्ताधरी पक्षाच्या काही चुकीच्या धोरणांचाही त्यांनी उहापोह केला.यावेळी लोकजागर इंडियाचे महासचिव महादेव मिरगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

झिरो बजेट लोकशाहीची संकल्पना साकारणार!काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेला नवा पर्याय म्हणून लोकजागर इंडियाच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा करण्याचे आपले प्रयत्न आहेत. यामध्ये विद्याथी, युवक, महिला आणि बुद्धीजीवींना उमेदवारी देत, आगामी विधानसभेच्या सर्वच २८८ जागांवर लोकजागर इंडियाचे उमेदवार उभे केले जातील. राज्यात लोकजागर इंडियाच्या माध्यमातून टप्प्या-टप्प्याने  सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये झीरो बजेट लोकशाही आणि गाव तिथे उद्योग ही दोन कलमं त्यांनी गुरुवारी जाहीर केली. तर उर्वरीत पाच कलमे एप्रिलपर्यंत जाहीर करणार असल्याचे प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :khamgaonखामगाव