शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोना सुसाट; ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ना आयसोलेशन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:31 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ लक्षणे नसलेल्या रुग्णांना हाेम क्वारंटाईन राहण्याची सूट ...

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ लक्षणे नसलेल्या रुग्णांना हाेम क्वारंटाईन राहण्याची सूट देण्यात येते़ ग्रामीण भागातही अनेक रुग्ण हाेम क्वारंटाईन असले तरी त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने ते गावभर फिरून काेराेनाचा प्रसार करीत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे़

गत काही दिवसांपासून शहरांसह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ शहरांसह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे़ लक्षणे नसलेल्या अनेक पाॅझिटिव्ह रुग्णांना आराेग्य विभागाच्या वतीने हाेम क्वारंटाईन राहण्याची मुभा देण्यात येते़ या सवलतीचा अनेक गावातील हाेम क्वारंटाईन रुग्ण दुरुपयाेग करीत असल्याचे चित्र आहे़ रुग्णांवर कुणाचाही वाॅच नसल्याने ते गावभर फिरत आहेत़ तसेच पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लाेकांचा शाेधही घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे़ गतवर्षी काेराेना रुग्ण पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील लाेकांची चाचणी करण्यात येत हाेती़ यावर्षी मात्र गेल्या वर्षीपेक्षा जास्त धाेकादायक ठरत असलेल्या काेराेनाच्या नव्या स्टेननंतरही पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लाेकांचा शाेध घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, शहरांबराेबरच गावांमध्येही काेराेना सुसाट वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे़

समित्या कागदावरच

गतवर्षी हाेम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या हाेत्या़

यावर्षी अनेक गावांमध्ये समित्या कागदावरच आहेत़

हाेम क्वारंटाईन रुग्णांवर अंगणवाडी सेविका, आराेग्यसेविका, पाेलीस पाटील, सरपंच, आदी स्थानिक कर्मचारी, अधिकारी, लाेकप्रतिनिधींनी लक्ष देणे अपेक्षित आहे़ मात्र, रुग्णांवर लक्ष देण्यासाठी कुणाकडेही वेळ नसल्याचे चित्र आहे़

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला खाे

काेराेनाचे संक्रमण वाढल्यानंतर गेल्या वर्षी पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आठ ते दहा लाेकांची चाचणी करण्यात येत हाेती़ मात्र, केवळ जवळच्या संपर्कातील म्हणजे कुटुंबातील लाेकांचीच चाचणी करण्यात येते़ तसेच स्राव दिल्यानंतर तीन ते चार दिवसांनी काेराेना तपासणीचा अहवाल येताे़ त्यामुळे, हे रुग्ण आधीच गावात फिरलेले असतात़ त्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह येताे़ अशा लाेकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी आराेग्य विभागाला कसरत करावी लागत आहे़

आराेग्य यंत्रणा हतबल

शहरांसह ग्रामीण भागात माेठ्या संख्येने काेराेना रुग्ण वाढत आहेत़ काेविड सेंटर हाऊसफुल्ल झाल्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना हाेम क्वारंटाईन ठेवण्याशिवाय आराेग्य विभागाकडे दुसरा पर्याय नाही़ तसेच रॅपिड टेस्टसाठी विशेष शिबिरे घेण्यात येतात़ या शिबिरांमध्ये केवळ पाॅझिटिव्ह रुग्णांना काेविड सेंटरमध्ये रेफर केले जाते़ या पाॅझिटिव्ह रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत नाही़ दरराेज रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने आराेग्य यंत्रणा हतबल असल्याचे चित्र आहे़