शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

वरठीत पाण्यासाठी तरूणांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:40 IST

मागील चार दिवसांपासून वरठीत जलशुद्धीकरण केंद्रावर दुरूस्तीचे काम जोमाने सुरू असले तरी दूषीत पाणी पुरवठा सुरूच आहे. अनियमित व दूषित पाणी पुरठ्याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देपाण्याचा प्रश्न बनला जटिल : चार दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मागील चार दिवसांपासून वरठीत जलशुद्धीकरण केंद्रावर दुरूस्तीचे काम जोमाने सुरू असले तरी दूषीत पाणी पुरवठा सुरूच आहे. अनियमित व दूषित पाणी पुरठ्याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, गुरूवारला दुपारी गावातील काही नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करीत दूषित पाण्याच्या मुद्दा उपस्थित केला. यावर तोडगा न निघाल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे.एक महिन्यापासून नळाला दूषित पाणी पुरवठा सुरु आहे. दूषित पाणी पुरवठ्याबाबत कुणी विचारपुस केली तर ग्रामपंचायतमधून परत पाठविण्यात येते. गतवर्षी नदी पात्रातील जलसाठा घटल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी माजी सरपंच संजय मिरासे यांच्यावर टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. नदीपात्रात जलसाठा नसल्यामुळे पाणी पुरवठा खंडित होणे स्वाभाविक होते. परंतु मुबलक पाणी असताना पाणी टंचाई उदभवल्याने गावात तीव्र असंतोष आहे.जल शुद्धीकरण यंत्रात आलेला बिघाड हा तांत्रिक नसून पंचायतीच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. जल शुद्धीकरण यंत्रात प्रमाणित साहित्य न वापरल्यामुळे दूषित पाणी पिण्याची नामुष्की नागरिकांवर ओढवली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यामुळे आजारी होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. दिवसेंदिवस नागरिकाचे पाण्यासाठी बेहाल होत असल्याने आज गुरूवारला काही तरूणांनी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल केला. यावेळी किशोर मारवाडे, अश्विन मेश्राम, प्रदीप भालाधरे, शुभम तिरपुडे भुपेश शहारे, पंकज वासनिक, निशांत गजभिये उपस्थित होते. पाण्याविषयी चर्चा करण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित नसल्याने पुन्हा हल्लाबोल आंदोलन करण्याचे या तरूणांनी बोलून दाखविले आहे. यावेळी उपसरपंच सुमित पाटील व ग्रामपंचायत सदस्य संघदीप उके यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली.पाणी वाटपात भेदभावनव्याने सत्तेत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठ्याची जबाबदारी घेणाºया एका पदाधिकाऱ्याने काही सदस्यांना हाताशी धरून पाणी वाटपात भेदभाव करीत असल्याचा आरोप होत आहे .सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी हेतुपरस्पर अनेक भागातील पाणी वाटपाचे वेळापत्रक बदलून पाणी पुरवठा करण्याची वेळ कमी करण्यात आली आहे. एकाच भागात अनेकवेळा नळाला पाणी देण्यात येते तर काही भागातील नागरिकांचा पारी पुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप होत आहे.वेळापत्रक नसल्याने घोळअनेक वर्षांपासून पाणी वाटपाचे वेळापत्रक सुरळीत होते. सद्यस्थितीत सुरु असलेल्या कारभारामुळे पाणी वाटपात घोळ निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा करण्याचे वेळापत्रक नियोजित नसल्याने विविध प्रश्न निर्माण होत आहेत. नळ येण्याची निर्धारित वेळ माहिती नसल्याने अनेकांना नळाचे पाणी नियमित मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई