शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

टेकेपार उपसा सिंचनचे पाणी सोडा

By admin | Updated: July 1, 2014 23:21 IST

निसर्गाने जनतेकडे पाठ फिरविल्यामुळे वरुणराजा शेतकऱ्यांवर अवकृपा करीत आहे. शेतकऱ्यांनी १०० टक्के धानाची पेरणी केली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पऱ्हे करपली

मानेगाव बाजार : निसर्गाने जनतेकडे पाठ फिरविल्यामुळे वरुणराजा शेतकऱ्यांवर अवकृपा करीत आहे. शेतकऱ्यांनी १०० टक्के धानाची पेरणी केली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पऱ्हे करपली असून शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यातून काही प्रमाणात पऱ्हे जगविण्यासाठी शेतीला तत्काळ पाण्याची नितांत गरज आहे.भंडारा तालुक्यातील टेकेपार उपसा सिंचन अंतर्गत जवळपास सात हजार हेक्टर ओलिताची शेती असून परिसरातील शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली आहे. १५ दिवस लोटूनही निसर्गाच्या अवकृपेमुळे पाणी न आल्यामुळे शेतकऱ्यांचे पऱ्हे वाळू लागले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन टेकेपार उपसा सिंचन विभागाच्या अभियंत्यांनी त्वरित पाणी सोडून शेतकऱ्यांचे पऱ्हे वाचवावे यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भंडारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते धावून आले. त्यांनी टेकेपार उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यांना शेतकऱ्यांची १०० टक्के धानाची करपलेली पऱ्हे जिवंत ठेवण्यासाठी उपसा सिंचन कालव्याचे पाणी तात्काळ सोडण्याविषयी निवेदन दिले. कालव्याचे पाणी तत्काळ न सोडल्यास मानेगाव, बोरगाव, सिल्ली, टेकेपार, तिड्डी, मकरधोकडा, गराडा, मेंढा, झबाडा, जाख, बासोरा, गराडा, दवडीपार, येथील शेतकऱ्यांच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. टेकेपार उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी तालुका राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष ईश्वर कळंबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव नरेश डहारे, माजी जि.प. उपाध्यक्ष दीपक गजभिये, पं.स. सदस्य रामेश्वर चांदेकर, महेश ढोमणे, विनोद साठवणे, सुनील माकडे, केशव रंगारी, दयानंद नखाते, संतोष हटवार व दिवाकर क्षीरसागर हे कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)