शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मतदान जनजागृतीत विद्यार्थ्यांचा सहभाग

By admin | Updated: October 13, 2014 23:19 IST

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा जिल्हा (७२.२१ टक्के) मतदानाच्या टक्केवारीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती

भंडारा : एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा जिल्हा (७२.२१ टक्के) मतदानाच्या टक्केवारीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महविद्यालयाचा विद्यार्थी आशिष ठाकरे हा अव्वल ठरला. जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धांचे निकाल जाहिर करण्यात आले. या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या निबंधाचा हा काही अंश...मतदान आवर्जुन करानिवडणुकीची रणधुमाळी ंअंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक पक्षाकडून प्रचार शिगेला पोहोचला आहे. काहीही करून जिंकून यायचे वेड प्रत्येकच उमेदवाराला लागले आहे. परंतु मतदारांनी न चुकता मतदान करावी, अशी अपेक्षा आहे. सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे खोट्या प्रचाराला बळी न पडता आपले अमूल्य मत, कर्तबगार व्यक्तीला द्या. कारण एखादा उमेदवार क्षेत्राचा उद्धार करू शकतो. अशाच माणसाच्या हाती राज्याची धुरा दिली पाहिजे, असे माझे मत आहे. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सत्ता मिळवायची परंतु ते विचार रुजविण्याचा प्रयत्न कोणताही पक्ष करीत नाही. गांधीजींच्या तत्वांचा आणि घटनात्मक मुल्यांचा जीवनात आग्रह धरलेला नाही. त्यामुळे आपले हक्क आणि कर्तव्य काय आहेत. तेच आपल्याला कळत नाही. माणसाने पुस्तक वाचले तर त्याचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कुणासमोरही नतमस्तक होत नाही. हा वसा आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आज मतदान करणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनदेखील प्रयत्न करीत आहे परंतू काही ठिकाणी अजूनही ३५-४० टक्केच मतदान होत आहे. मतदान करणारा मतदार जर संघटीत होऊन, एकत्रित येऊन आणि विचार करून मतदान करत असेल तर तो या देशात निर्माण होणाऱ्या समस्या सट्टा, जुगार, दारू, भ्रष्टाचार, बलात्कार, महागाई, हुंडाबळी, महिलांवरील होणारे अत्याचार या गोष्टी थांबविणे हे मतदारांच्या हातात आहेत. सुजान मतदार हाच देशाला सुजलाम, सुफलाम करु शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तरच उद्याचा उष:काल तुमच्या हातात आहे’ अन्यथा नाही. बाबासाहेबांनी पुन्हा म्हटले होते की ‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. तेव्हाच तो बंड करून उठेल’. गुलामाला त्याच्याविरूद्ध होणाऱ्या अन्यायाची माहिती मिळाली तर तो अन्यायाविरूद्ध लढू शकतो, असे मला वाटते.