शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनने आणली सायबर कॅफेवर संक्रांत

By admin | Updated: October 29, 2014 22:44 IST

दोन वर्षाअगोदर सायबर कॅफेला फार महत्व होते. मित्रांसोबत चॅटिंग, शैक्षणिक कामासाठी सायबर कॅफेचा वापर, ई-मेलद्वारे संदेश पाठवण्यासाठी सायबर कॅफेवर गर्दी असायची.

भंडारा : दोन वर्षाअगोदर सायबर कॅफेला फार महत्व होते. मित्रांसोबत चॅटिंग, शैक्षणिक कामासाठी सायबर कॅफेचा वापर, ई-मेलद्वारे संदेश पाठवण्यासाठी सायबर कॅफेवर गर्दी असायची. मात्र, आता हे चित्र पालटले असून आता सायबर कॅफेवर मोबाईलमुळे संक्रांत आली आहे.आधुनिक काळातील नव्या तंत्रज्ञानाबरोबरच मोबाईल जगतातही क्रांती झाली आहे. टॅब, आयफोन यांच्याबरोबर दररोज बाजारात येणारे नवीन तंत्रज्ञान, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमती, नवीन विकसित तंत्रज्ञानाच्या वस्तू वापरण्याची वृत्ती, सहज आणि वेगाने उपलब्ध होणारे इंटरनेट यामुळे सध्याचा जमाना चांगलाच वेगवान झाला आहे. जगभरात कोणतीही गोष्ट घडली की, ताबडतोब ती आपल्यापर्यंत पोहोचते. गॅस सिलिंडरचा नंबर लावण्यापासून घरगुती कोणतेही बिल भरण्यासाठी, स्पर्धा परीक्षांचा फार्म भरण्यापासून सोशल मिडिया वापरण्यापर्यंतची सर्वच कामे घरच्या घरी हातातल्या मोबाईल, टॅब या साधनांमुळे सहज शक्य होत आहेत. साधारणपणे १२-१५ वर्षापूर्वी सायबर कॅफे नावाची संकल्पना रूढ होऊ लागली. सायबर कॅफे ही संकल्पना आपल्याकडे फारशी माहिती नव्हती. इंटरनेट म्हणजे खूब काही तरी गंभीर, अवघड, आपल्या कार्यकक्षेच्या बाहेरील गोष्ट असेच बोलले जात होते. परंतु, हळूहळू शिक्षण, सामाजिक, आर्थिक आदी सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचा शिरकाव होऊ लागला. त्यानंतर सायबर कॅफेची गरज वाढल्याने शहरात ठिकठिकाणी सायबर कॅफे उघडण्यात आले.गेम, सोशल नेटवर्किंग साईट्स, त्यावर आधारित कलाकृती, शैक्षणिक अभ्यासक्रम वाढत गेले तसे समाजात इंटरनेटबाबत अधिक माहिती होत गेली. सायबर कॅफे विद्यार्थी, तरूणांच्या गर्दीने फुलून जात होते. महाविद्यालय प्रवेश असो, अभियांत्रिकीचा कॅप राऊंड असो, एसटी किंवा रेल्वेचे आरक्षण असो प्रत्येक गोष्टीच इंटरनेटची पर्यायाने इंटरनेट कॅफेची गरज भासू लागली. त्याच दरम्यान, आपल्याकडे मोबाईल विकसित होत गेला. सुरूवातीला मोबाईलही महागडे होते, मात्र, नंतर मोबाईल निर्मिती जगतात विविध कंपन्यांनी शिरकाव केल्याने सर्वसामान्यांना परवडेल अशा मोबाईलची निर्मिती झाली आणि प्रत्येक घरात मोबाईलने प्रवेश केला. आता तर स्मार्टफोनही परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होत असल्याने फेसबुक, ट्विटरसारखे सोशल साईट्स मोबाईलवरच उपलब्ध झाले आहे. पर्यायाने इंटरनेटची सुविधा मोबाईलवर मिळत असल्याने अनेक शैक्षणिक कामेही मोबाईलवर होत असल्याने सायबर कॅफेत तासनतास घालविणारा विद्यार्थी आता घरबसल्या मिळेल त्या रिकाम्या वेळेत मोबाईलचा वापर करू लागला आहे. मोबाईलने जग जवळ आणले तर इंटरनेटने जग सोडले आहे. त्यामुळे सायबर कॅफेची गरज आता तेवढी भासत नसून हातातच तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. (शहर प्रतिनिधी)