शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

लघु कालव्याच्या अपूर्णावस्थेचा फटका

By admin | Updated: April 29, 2015 00:35 IST

गोसीखुर्द (इंदिरासागर) धरणाच्या उजव्या कालव्यामुळे पवनी तालुक्यातील शेकडो हेक्टर कोरडवाहू शेतजमीन सिंचनाखाली ...

३० हेक्टर शेतजमीन कोरडवाहू : कालवा पूर्ण करण्याची मागणी
पवनी : गोसीखुर्द (इंदिरासागर) धरणाच्या उजव्या कालव्यामुळे पवनी तालुक्यातील शेकडो हेक्टर कोरडवाहू शेतजमीन सिंचनाखाली आलेली असताना त्याच कालव्यापासून काढण्यात आलेले लघु कालवे अपूर्णावस्थेत असल्याने रेवनी भोजापूर येथील शेतकऱ्यांची ३० हेक्टर शेती कोरडवाहू राहिलेली आहे. तसेच अपूर्ण कालवा पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. धानाचे पिकात पाणी साचून राहिल्याने कित्येक शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अपूर्ण लघुकालवा पूर्ण करावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
उजव्या कालव्यापासून रेवनी भोजापूर लघु कालवा एमएल२ सर्व्हेनुसार रानपौना पांदन रस्त्यापर्यंत पूर्ण करावयाचा होता. सर्व बाधीत शेतकऱ्यांना जमीनचा मोबदला देण्यात आला. परंतु मोबदला घेऊन एका शेतकऱ्याने नहराचे काम अडविले. त्यामुळे त्यापुढचे कालव्याचे काम अपूर्ण राहिले. लघु कालवा अपूर्ण राहिल्याने त्यामुळे पाणी पोहचू शकत नाही. हा कालवा रानपौना पांधण रस्त्यापर्यंत पूर्ण केल्यास परिसरातील ३० हेक्टर शेती ओलीताखाली येणार आहे.
सद्यस्थितीत पूर्ण शेती कोरडवाहू असल्याने खरीप पिकाशिवाय अन्य पीक शेतकरी घेऊ शकत नाही.
खरीप पिकाचे वेळी नहरात (कालव्यात) सोडलेले पाणी आजूबाजूचे शेतात साचून राहिल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी लघु कालवा एमएल २ चे काम पूर्ण करावे अशा आशयाचे निवेदन नकटू वैद्य, चिंधू वैद्य, तिकवडू मंडपे, चोखोबा मंडपे, हेमराज मंडपे, हरिदास मंडपे, तुरसा चहांदे, व्यंकट मंडपे, शंकर वैद्य व अन्य शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता उजवा कालवा विभाग क्र. १ यांच्याकडे दिलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)