शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सहा रुग्णांना नागपूरला हलविले

By admin | Updated: August 23, 2014 23:47 IST

पवनी तालुक्यातील सेंद्री (खुर्द) या हजार लोकवस्तीच्या गावात डेंग्यू आजाराने कहर केला आहे. गावात आठ दिवसांपासून तापाची लागण झाली असून सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सेंद्री येथे डेंग्यूची साथ : वैद्यकीय पथक दाखलकोंढा कोसरा : पवनी तालुक्यातील सेंद्री (खुर्द) या हजार लोकवस्तीच्या गावात डेंग्यू आजाराने कहर केला आहे. गावात आठ दिवसांपासून तापाची लागण झाली असून सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या सेंद्री (खुर्द) गावात आठ दिवसांपासून तापाची साथ आहे. यामध्ये बालकांची संख्या जास्त आहे. वेदांत अमोल चिचमलकर (२), विलास नामदेव सुखदेवे (२८), नैतिक धीरेंद्र आंबेकर (१), पिंकू राजकुमार सुखदेवे (१०), राणी लक्ष्मण सुखदेवे (८), अनिल जाधव गायधने (४०) या रुग्णांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. यासंदर्भात कोंढा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर लेपसे यांना विचारले असता ते म्हणाले, सेंद्री खुर्द येथे वैद्यकीय पथकाद्वारे रुग्णांची तपासणी व उपचार केले जात आहे. सेंद्री येथील दोन रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे तर दोघांमध्ये विषमज्वराची लक्षणे आढळून आल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान सेंद्री (खुर्द) प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व उपसरपंच होमराज उपरीकर, पोलीस पाटील जगदीश गायधने, गणपत बनकर, शिक्षकांनी गावात रॅलीद्वारे जनजागृती केली. दुपारी १२ वाजता दरम्यान डेंग्यू व विषमज्वरच्या वाढत्या प्रमाणामुळे गावकरी भीतीत आहेत. गावात आरोग्याच्या सोयी उपलब्ध करण्याची मागणी उपसरपंच होमराज उपरीकर यांनी केली आहे.करडी पालोरा : करडी : मोहाडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील व कोका अभयारण्याशेजारी असलेल्या ढिवरवाडा गावात डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाली आहे. मागील ८ ते १० दिवसापासून नागरिक त्रस्त आहेत. आतापर्यंत सामान्य रुग्णालयातून ७ रुग्णांना सुटी देण्यात आली. मात्र दररोज नवीन रुग्ण रुग्णालयात भरती होत आहेत. डेंग्यूसदृष्य आजाराने सध्या सामान्य रुग्णालयात अभिषेक यशवंत बेहलपाडे (६), श्रीकृष्ण वातू वनवे (३९), आशा यशवंत बेहलपाडे (२८) भरती असून आज सकाळी शुभम रमेश बिल्लोरे (१०), क्रिष्णा अशोक केवट (३), रजत अशोक केवट यांना भंडारा येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली. अनमोल अशोक रोटके (७) याला डेंग्यूची लागण झाल्याची पुष्टी झाल्याने त्याला सामान्य रुग्णलायातून नागपुरला हलविण्यात आले. गावातही मलेरिया, टायफाईट व जलजन्य आजाराने नागरिक त्रस्त आहेत. त्वरीत फॉगींग मशीनने फवारणी करण्याबरोबर आरोग्य शिबिर लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.बोअरवेलच्या पाण्यात अळ्यागावात विविध आजाराचा प्रकोप आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची साफसफाई केली. फिनाईल टाकला, गावातून शाळेच्या माध्यमातून प्रभातफेरी काढली. फॉगींग मशीनने धूर फवारणीसाठी आरोग्य विभागाला कळविण्यात आले अशी माहिती सरपंच संगीता वनवे, ग्रामसेवक एस.आर. धांडे यांनी दिली. गावातील एका बोअरवेल्सच्या पाण्यातून अळ्या निघत आहेत. जंतूनाशक औषधी टाकल्यानंतरही अळ्या निघणे बंद झाले नसल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य हनुवंत कनपटे यांनी ग्रामपंचायतमध्ये सर्वांसमोर दिली. ग्रामपंचायत हतबल असल्याचे सांगत असून नागरिक दुरुस्तीची व उपाययोजनेची मागणी करीत आहेत.(लोकमत चमू)