शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांची टंचाई भेडसावणार !

By admin | Updated: June 11, 2017 00:14 IST

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ४० हजार १३५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली.

खरीप हंगाम तोंडावर : केवळ १७,५२९ क्विंटल बियाणे उपलब्धदेवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कयावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ४० हजार १३५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. दि.३१ मे अखेर केवळ १७ हजार ५२९ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मागणीपेक्षा बियाणांचा पुरवठा कमी झाला असल्याने जिल्ह्यात बियाण्यांची तीव्र टंचाई भेडसावण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०१७-१८ करीता भातासाठी ३८ हजार ८७० क्विंटल, सोयाबीनसाठी ५६५ क्विंटल आणि तुरसाठी ७०० क्विंटल असे एकूण ४० हजार १३५ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली. त्यापैकी महाबिजमार्फत भाताचे १४ हजार ७० क्विंटल, सोयाबिनचे १८५ क्विंटल व तुरीचे ३०० क्विंटल असे एकूण १४ हजार ५५५ क्विंटल बियाणांची मागणी तर, खासगीमार्फत भाताचे २४ हजार ८०० क्विंटल, सोयाबिनचे ३८० क्विंटल व तुरीचे ४०० क्विंटल, असे एकूण २५ हजार ५८० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली. आयुक्तालयाकडून भाताकरीता १७ हजार ३५४ क्विंटल, सोयाबिनसाठी ३५ क्विंटल व तुरीकरीता १३९.३ क्विंटल असे एकूण १७ हजार ५२९ क्विंटल बियाणे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. मागिलवर्षी सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात भाताखालील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७६ हजार हेक्टर असून प्रत्यक्षात १ लाख ७३ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. सन २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेने खरीप हंगामासाठी भाताकरीता ३३ हजार २०० क्विंटल, सोयाबिनकरीता ३ हजार ८०० व तुरीकरीता ६५० क्विंटल, असे एकूण ३७ हजार ६५० क्विंटल बियाणांची मागणी नोंदविली होती. त्यापैकी भाताचे ३० हजार ५३१ क्विंटल, सोयाबिनचे ३२१ व तुरीचे १६० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले होते. यावर्षीच्या खरीप पिकाच्या नियोजनामध्ये जिल्ह्यात भात, सोयाबिन व तूर हे तीन प्रमुख पिके आहेत. भात पिकाचे क्षेत्रात तीन हेक्टरने वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने नोंदविली आहे. यावर्षी प्रशासनाने भातपिकासाठी ३८ हजार ८७० क्विंटल बियाणांची मागणी केली असली तरी कृषी आयुक्तालयाकडून ३१ मे अखेर १७ हजार ३५४ क्विंटल भात बियाणांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. दमदार पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांसाठी पुन्हा २२बियाण्यांचा मुबलक पुरवठा करण्यात येईल, असे जिल्हा परीषद कृषी विभागाकडून सांगण्यात आले.बळीराजा बियाण्यांच्या जुळवाजुळवीत व्यस्तशेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, उन्हाळवाही, काडी-कचरा वेचणी आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहे. शेतामध्ये शेणखते पसरविण्याचेही काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे धरणी हिरवा शालू नेसण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. बळीराजा आता बियाण्यांची कशीबशी जुळवाजुळव करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र दमदार पाऊस न कोसळल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. मागील वर्षीचा दुबार, तिबार पेरणीचा अनुभव बघता बळीराजा यावर्षी पेरणीकरिता सध्या कोणतीही "रिस्क" न घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्याकडील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. पावसावरच शेतकऱ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाली असून मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा भार पेलतानाच खरीप हंगामाच्या बियाण्यांची जुळवाजुळव करताना उसणवारी करून कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय दिसत नाही.