लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अखिल भारतीय काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘भारत बचाव, संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन शनिवारी येथे करण्यात आले होते. जिल्हा काँग्रेस कार्यालय ते राजीव गांधी चौकापर्यंत आयोजित या मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २८ डिसेंबर १८७५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळ उभी केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळवून दिले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार केले. संविधानानुसार देश चालतो आहे. परंतु आज केंद्रातील भाजप सरकार लोकशाही विरोधी कार्यपद्धतीने देशात फुट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी सांगितले.जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण केले. यावेळी प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, विकास राऊत, माणिकराव ब्राम्हणकर, मच्छीमार सेलचे राष्ट्रीय सचिव प्रकाश पचारे, सीमा भुरे, महेंद्र निंबार्ते, अजय गडकरी, गौरीशंकर मोटघरे, दिलीप निखाडे, तालुका कार्याध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, शंकर राऊत, अमर रगडे, प्रशांत देशकर, प्रिया खंडारे, शुभम गभणे, मार्कंड भेंडारकर, किशोर राऊत, प्रा.टी.डी. मारबते, संजय वरगंटीवार, जयश्री बोरकर, सीमा बडवाईक, सचिन फाले यांच्यासह एनएसयुआय, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘भारत बचाव, संविधान बचाओ’ फ्लॅग मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST
जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २८ डिसेंबर १८७५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळ उभी केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळवून दिले.
‘भारत बचाव, संविधान बचाओ’ फ्लॅग मार्च
ठळक मुद्देकाँग्रेस स्थापना दिवस। जिल्हा काँग्रेस कमिटीचा पुढाकार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}