शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात लाल मिरचीने दिली शेतकऱ्यांना साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST

पालांदूर (चौ.) : कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असताना शेतीही त्याला अपवाद कशी ठरणार. शेतमालाचे त्यातही भाजीपाल्याचे ...

पालांदूर (चौ.) : कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असताना शेतीही त्याला अपवाद कशी ठरणार. शेतमालाचे त्यातही भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला. अशातच मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी मिरची शेतातच पिकू देऊन लाल मिरचीचे उत्पन्न घेणे सुरू केले. त्यामुळे या संकटात शेतकऱ्यांना लाल मिरचीने चांगलीच साथ दिल्याचे पालांदूर परिसरात दिसत आहे.

दरवर्षी शेतकरी आपल्या सोयीने बाजारपेठेचा अभ्यास करून पीक घेतात. प्रचंड परिश्रम घेऊन शेतात लागवड करतात. मात्र नैसर्गिक प्रकोप शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजलेला असतो. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षीही तसेच कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत आहे. तालुकास्तरावरच्या बाजारपेठा प्रभावित झाल्या आहेत. भाजीपाला बाहेर जाणे थांबले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर गडगडले. नाईलाजाने शेतकऱ्यांना दोन ते चार रुपये किलोने वांगे, टोमॅटो विकावे लागले. पानकोबी, फुलकोबीचा गड्डा तर एक रुपयाला विकण्याची वेळ आली. अशा स्थितीत पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना लाल मिरचीने साथ दिली. ३० रुपये किलो असलेला दर १५ रुपये किलोपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांनी शेतातील मिरची न तोडण्याचा निर्णय केला. मिरची लाल पिकविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला.

साडेतीन किलो हिरव्या मिरचीचे एक किलो लाल मिरचीएवढे वजन भरते. लाल मिरचीचे दर सध्या १४० रुपये प्रती किलो आहे. लाल मिरचीचा हंगाम सुरू झालेला आहे. अनेक जण मिरची खरेदी करून ठेवतात. त्यामुळे लाल मिरचीला मागणी आहे. आजच्या दराचा विचार केल्यास शेतकऱ्यांना यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. लाल मिरची विकली गेली नाही तर शीतगृहात नागपूरला ठेवण्याची सोय आहे असे प्रगतीशील शेतकरी अरुण पडोळे यांनी सांगितले.

बाॅक्स

कसारी मिरचीचे भाव गगनाला

कसारी अर्थात बोट मिरचीचे भाव गगनाला भिडले आहे. २३० ते २५० रुपये एवढा दर मिळत आहे. चुलबंद खोऱ्यात पालांदूर परिसरात या मिरचीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. शहरी भागात या मिरचीला मागणी असल्याची माहिती मिरची सातराचे व्यवस्थापक सुखदेव हटवार यांनी सांगितले.

बाॅक्स

महिला मजुरांना मिळाले काम

मिरची तोडण्यासाठी महिला मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे परिसरातील शेकडो हातांना काम मिळाले आहे. परिसरात मिरचीचे लालचुटूक सातरे सजले आहेत. दररोज या मिरचीवर लक्ष देण्यासाठी शेतकरी खपत आहे. आतापासून पाच किलो, दहा किलो मिरचीची मागणी सुरू झाली आहे. किमान पाच ते सात क्विंटल मिरची स्थानिक ग्राहकांना विकली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाचणार असून ग्राहकांनाही ती कमी किमतीत मिळेल. पालांदुरलासुद्धा लाल मिरचीचा मोठा बाजार भरतो. सध्या पालांदूर परिसरात मिरचीला चांगली मागणी असून मजुरांनाही काम मिळाल्याने कोरोना काळात चांगलाच दिलासा मिळत आहे.