शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

शेततळ्यातून महिला शेतकऱ्यांनी साधली समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:24 AM

भंडारा : शेतीत शाश्‍वत उत्पादन मिळविण्यासाठी पाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे.पाण्याची सोय झाली तरच चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते, ...

भंडारा : शेतीत शाश्‍वत उत्पादन मिळविण्यासाठी पाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे.पाण्याची सोय झाली तरच चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते, हे लक्षात येताच कृषी विभागाच्या मार्गदर्शनात शेततळे उभारले.आणि आज भाजीपाला लागवडीतून लाखोंचा नफा महिला शेतकऱ्याने मिळवला आहे.

भंडारा तालुक्यातील चिखली येथील मनिषा तानाजी गायधने या महिला शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी ज्या पद्धतीने शेततळ्याचा उपयोग करून घेतला तसा अन्य शेतकऱ्यांनी उपयोग केल्यास गायधने यांनी शेतीत जी प्रगती साधली आहे तशी प्रगती इतर शेतकऱ्यांच्या शेतीतही होऊ शकते याचा वस्तुपाठच गायधने कुटुंबाने समोर ठेवला आहे. भंडारा तालुक्यातील चिखली येथील महिला शेतकरी मनिषा गायधने यांची भाजीपाला लागवडीतून लाखोंचा नफा मिळवणारी यशोगाथा सर्वांना प्रेरणा देणारी आहे. शेततळे तयार केल्यानंतर गायधने यांनी चार एकर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड केली. यात त्यांनी पाऊण एकर कारली, पाऊण एकर भटई, अडीच एकर मिरची आणि वांगी लागवड केली आहे.पारंपरिकतेला फाटा देण्यासाठी त्यांनी मल्चिंग व ठिबकवर मिरची लागवड केली आहे.यासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला आहे. मात्र आतापर्यंत मिरचीच्या सहा तोड्यातून त्यांना पाच लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.या सोबतच लॉकडाउनच्या दोन महिन्यात फक्त भाजीपाल्यातून ७० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. मात्र यासाठी फक्त प्रचंड मेहनत उपयोगाची नसून योग्य मार्गदर्शन व तंत्रज्ञान ज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कृषी कृषी सहाय्यक रेणुका दराडे, प बीटीएम सतीश वैरागडे, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले,उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभल्याने फायदा झाल्याचे सांगितले.

बॉक्स

हरिद्वार, सिक्कीमला घेतले सेंद्रिय शेतीचे धडे

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गायत्री परिवार संस्थानअंतर्गत गृह उद्योग उभारणी आणि सेंद्रिय शेती विषयक प्रशिक्षण मनिषा गायधनी यांनी घेतले. यासोबत पती तानाजी गायधने यांनी सिक्कीम येथे सेंद्रिय शेतीची पाहणी करून प्रशिक्षण घेतले. त्यानुसार स्वतः लागवड केलेल्या भाजीपाला लागवडीतून त्यांनी गावातील दहा महिलांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे.यासोबत मिरची पावडर निर्मिती व विक्रीतून त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत.

बॉक्स

कायमस्वरूपी सिंचनासाठी घेतले शेततळे

कोरडवाहू शेतीत पाणी नसल्याने अपेक्षित उत्पन्न मिळायचे नाही.त्यातच ऐन हंगामात पिकांना पाणी कमी पडायचे.यातून मार्ग काढण्यासाठी सन २०१६-१७ मध्ये परसोडीच्या कृषी सहायक रेणुका दराडे यांच्या मार्गदर्शनात मागेल त्याला शेततळे २५ बाय २० बाय ०३ आकाराचे शेततळे घेतले, आणि आज तेच कृषी विभागाचे शेततळे गायधने कुटुंबीयांना जगण्यासाठी आधार ठरत आहे.

बॉक्स

अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेसह वनशेतीचा घेतला लाभ

सन २०२०-२१ अंतर्गत सुरु झालेल्या अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेचा लाभ घेऊन त्यांनी रोपवाटिका उभारली आहे. यासोबत भाऊसाहेब फुंडकर योजनेतून एक एकर सीताफळ लागवड तर वनशेती अंतर्गत बांधावर एक एकर शेवग्याची लागवड केली आहे. यासोबतच ते सातत्याने उपक्रमशील शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शनात आयोजित प्रशिक्षणाला उपस्थिती दर्शवतात.

कोट

शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब व योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनात शेती केल्यास शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते हे महिला शेतकऱ्यांनी साध्य करून दाखवले आहे.जिल्ह्यात भाजीपाला व फळ लागवडीसाठी पोषक वातावरण आहे त्याचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.