शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

समृध्दग्राम योजनेसाठी १९६ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव

By admin | Updated: August 23, 2014 01:30 IST

ग्रामीण पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृध्द व संपन्न गावाची निर्मिती करणे काळाची गरज आहे.

प्रशांत देसाई भंडाराग्रामीण पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृध्द व संपन्न गावाची निर्मिती करणे काळाची गरज आहे. पर्यावरण संतुलन ठेऊन ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल, यासाठी पर्यावरण संतुलित समृध्दग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने पाठविले आहे. लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) व शिवनी (मोगरा) या ग्रामपंचायतींना नागपूर विभागातून पर्यावरण विकासरत्न पुरस्कार घोषीत झाला आहे. मागील तीन वर्षात या योजनेत सहभागी ग्रामपंचायतींसाठी शासनाकडून २३ कोटींचा निधी भंडारा जिल्हा परिषदेला मिळाला आहे. पर्यावरण संतुलित समृध्दग्राम योजना सन २०१०-११ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेला तीन वर्ष पूर्ण झाली आहे. सलग तीन वर्ष निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींची योजनेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करूनच समृध्द व संपन्न गावांची निर्मिती ही काळाची गरज आहे. यासाठी जल, जमीन, जंगल, हवा व वनस्पती यांचे योग्य व्यवस्थापन करून भौतिक सोयी सुविधांची निर्मिती पर्यावरण संतुलन राखून केल्यास ग्रामस्थांना राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.भू-व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा, मनुष्यविष्ठा, वैयक्तिक स्वच्छता, ऊर्जा, जमिनीची धूप, अंतर्गत रस्ते विकास, वृक्षारोपण, सामाजीक वनीकरण, उद्याने आणि नागरिकांच्या सहभागातून विविध योजना एकात्मिक पध्दतीने राबवून गावाला समृध्द बनविणे हा यामागील उद्देश आहे. जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर व पवनी या तालुक्यांनी पर्यावरण संतुलित समृध्दग्राम योजनेत सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी ४८८ ग्रामपंचायती पात्र झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वर्षीसाठी अपात्र व नवीन २५२ ग्रामपंचायतींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर तिसऱ्यावर्षी १८७ ग्रामपंचायतींचा पात्र ठरल्या आहेत. चौथ्या वर्षी जिल्हा परिषदने १९६ ग्रामपंचायतींचा प्रस्ताव पाठविला आहे. तीन वर्षात शासनाचे निकष पूर्ण न करणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. पहिल्या वर्षी ५३ ग्रामपंचायती, दुसऱ्या वर्षी २८९, तिसऱ्यावर्षी ३५५ तर चौथ्या वर्षी ११९ ग्रामपंचायती अपात्र ठरल्या आहेत.