पावसाअभावी जमिनीला भेगा; पऱ्हे करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:42+5:30

खरीप हंगामाच्या प्रारंभी रोहिणी नक्षत्र कोरडा गेल्यानतर मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाला. परंतु आठवड्यापासून प्रचंड शेतकरी तापमानाने शेतकरी हैराण झाले. पेरण्या झालेल्या शेतातील पऱ्हे कडक उन्हामुळे पाण्याविना करपू लागली आहेत. सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्याने रोवण्या थांबविण्यात आल्या आहेत. दोन चार दिवसात पाऊन न झाल्यास केलेली मेहनत व पैसा वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांत आहे.

no rain | पावसाअभावी जमिनीला भेगा; पऱ्हे करपली

पावसाअभावी जमिनीला भेगा; पऱ्हे करपली

googlenewsNext



पाऊस बेपत्ता : करडी परिसरातील ५,४६४ हेक्टर क्षेत्रातील पीके संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोरडवाहू करडी परिसरात सुमारे ५,४६४ हेक्टर आर क्षेत्रात धान पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात. सुमारे १९७ हेक्टर क्षेत्रात धुऱ्यावर तूर पिकाची लागवड करण्यात आली. वैनगंगा नदीकाठावरील सिंचनाची सोय असलेल्या भागात सुमारे ५० हेक्टर क्षेत्रात रोवण्या आटोपल्या. परंतु आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणीला भेगा पडल्या असून पऱ्हे करपू लागली आहेत.
कोरडवाहू असलेल्या करडी परिसरातील २५ गावांवर निसर्गाचा प्रकोप वर्षानुवर्षे सुरू आहे. चौहूबाजुला जंगल असताना भुगर्भात पाण्याचा पुरेसा साठा नाही. तलावांत अतिक्रमणे व उथळपणांमुळे जलसाठा राहत नाही.
विहिर खोदली तरी खरीपातही पाणी पुरत नाही. अशा बिकट परिस्थितीतही निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकरी आजही चांगल्या उत्पन्नाची आशा धरून आहे.
यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी रोहिणी नक्षत्र कोरडा गेल्यानतर मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाला. परंतु आठवड्यापासून प्रचंड शेतकरी तापमानाने शेतकरी हैराण झाले. पेरण्या झालेल्या शेतातील पऱ्हे कडक उन्हामुळे पाण्याविना करपू लागली आहेत. सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्याने रोवण्या थांबविण्यात आल्या आहेत. दोन चार दिवसात पाऊन न झाल्यास केलेली मेहनत व पैसा वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांत आहे.

पीक कर्जासाठी धडपड
करडी परिसरात पीक कर्जासाठी बँक व सोसायट्यांच्या चकरा शेतकºयांनी वाढविल्या आहेत. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात माघारल्या आहेत. विविध बँकांच्या कर्ज नसल्याच्या दाखल्यांसाठी शेतकऱ्यांना भटकावे लागत आहे. सहकार क्षेत्रातील बँका वगळता राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या नावाने बोटा मोडीत आहेत.
गरजेनुसार खताचा पुरवठा करण्याची मागणी
२४ ते २६ जून या कालावधीत करडी परिसरातील १० कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये करडी चार, मुंढरी चार तर प्रत्येकी एक पालोरा व मोहगाव कृषी सेवा केंद्रांचा समावेश आहे. कृषी विभागाने यावर वेळीच उपाय योजना करून शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार खतांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

Web Title: no rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.