शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाची वक्रदृष्टी कायम

By admin | Updated: July 12, 2014 23:30 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळानंतर शेतकरी स्वत:ला सावरत नाही तोच यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतकरी संकटाच्या भीतीने हतबल झाल्याचे दिसत आहे.

साकोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळानंतर शेतकरी स्वत:ला सावरत नाही तोच यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतकरी संकटाच्या भीतीने हतबल झाल्याचे दिसत आहे. सततच्या नापीकीमुळे शेतकऱ्यांची दमछाक होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
मागीलवर्षीच्या खरीप हंगामात जून महिना सुरू होताच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले. या अतिवृष्टीमुळे मागीलवर्षी धान, तुर, सोयाबिन तसेच खरीप हंगामातील इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर रब्बी हांगामातही संततधार पावसाने व गारपिटीने पिकाचे होत्याचे नव्हते केले.
मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळातून शेतकरी स्वत:ला सावरत नाही तोच यावर्षीच्या खरीप हंगामात त्याची भरपाई मिळेल या हेतुने शेतकऱ्यांनी उन्हातान्हात राबराब राबून शेतीची मशागत केल्यानंतर बँकेतून कर्ज काढून तर काही शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून खरीप हंगामाची कशीबशी धानभरणी केली.
पावसाने अजूनपर्यंत हजेरी न लावल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. उष्णतेच्या तडाख्यात हिरवेगार दिसरणारे शेतशिवार आता ओसाड दिसू लागले आहेत. अशा संकटाच्या मालिकेने शेतकरी पुस्ता हादरून गेला आहे. शेतकऱ्यांनी आता पाऊस येईल या आशेने पेरणी उरकून घेतली. परंतु पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या दिसत आहेत.
उन्हाचा तडाखा पावसाची पाठ त्यामुळे तालुक्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या सावटात सापडलेला दिसत आहे. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)