शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: भंडारा जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत तिरंगी लढतीचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 04:30 IST

तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी बंडखोरी करत भाजपपुढे मोठ आव्हान उभे केले.

- ज्ञानेश्वर मुंदेभंडारा जिल्ह्यातील सद्यस्थितीत तीनही जागा भाजपच्या ताब्यात असून विद्यामान तीनही आमदारांना तिकीट नाकारून भाजपने त्यांना मोठा धक्का दिला. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी बंडखोरी करत भाजपपुढे मोठ आव्हान उभे केले. तर भंडारात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष आणि साकोलीत काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत. एक विद्यमान आणि दोन माजी आमदार मैदानात उतरल्याने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.साकोली मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार राजेश काशीवार यांचे तिकीट कापून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसच्या किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांना काँगे्रसने मैदानात उतरविले. दोन्ही पक्षाने हेवीवेट उमेदवार दिल्याने येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसने तिकीट नाकारल्याने माजी आमदार सेवक वाघाये यांनी ऐन वेळेवर वंचित बहुजन आघाडीचा हात धरत मैदानात उडी घेतली आहे. येथील तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कुणाचे गणित बिघडविते, हे येथे महत्वाचे ठरणार आहे.तुमसरमध्ये भाजपने विद्यमान आमदार चरण वाघमारे यांचे तिकीट ऐन वेळेवर कापले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आमदार वाघमारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. पक्षश्रेष्ठींकडून आलेला दबाव झुगारून त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. तर काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीने राजू कारेमोरे यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपपुढे बंडखोराने तगडे आव्हान उभे केले आहे.भंडारा मतदारसंघ युती आणि आघाडीने मित्रपक्षासाठी सोडला आहे. युतीत रिपाइं आठवले गटाचे अरविंद भालाधरे तर आघाडीतर्फे पिरिपा कवाडे गटाचे जयदीप कवाडे रिंगणात आहे. शिवसेनेचा दावा असलेला हा मतदारसंघ मित्रपक्षाला सोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या उमेदवारीने या निवडणुकीला वेगळी दिशा मिळाली.प्रचारातील चर्चेचे मुद्देकेंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजनांच्या मुद्यावर भाजपकडून निवडणूक लढविली जात आहे. कोट्यवधी रूपयांच्या विकास कामांचे दाखले दिले जात आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून बंद पडलेले उद्योग, धानाचे भाव, बेरोजगारी यावर भर दिला जात आहे.साकोली मतदारसंघात भाजपचे डॉ. परिणय फुके विकासाचा मुद्दा घेवून जनतेपुढे जात आहे. सुरू न झालेला भेल प्रकल्प या निवडणुकीत भाजपने महत्वाचा मुद्या केला आहे. काँग्रेसचे नाना पटोले शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरत असून स्थानिक विकासाचा मुद्दा पुढे करीत आहे.गोसे प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन, सिंचनासाठी प्रकल्पाचे पाणी, नाग नदीमुळे दूषित झालेली वैनगंगा, शुद्ध पेयजल हे मुद्दे तीनही मतदारसंघात कळीचे ठरणार आहे. धानाच्या हमीभावाचा मुद्दाही या निवडणुकीत चर्चेत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराtumsar-acतुमसरsakoli-acसाकोलीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019