शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

क्विंटलमागे ३०० रूपयांचा तोटा

By admin | Updated: October 14, 2015 00:42 IST

खरीप हंगामातील हलके धान निघाले आहेत. मात्र अजूनपर्यंत शासनाने धान आधारभूत केंद्र सुरुच केले नाही.

आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करा : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरजतुमसर : खरीप हंगामातील हलके धान निघाले आहेत. मात्र अजूनपर्यंत शासनाने धान आधारभूत केंद्र सुरुच केले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपले धान आधारभूत केंद्रावरील दर निश्चितीपेक्षा कमी दराने विक्रीला काढले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये प्रमाणे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.तालुक्यातल्या काही भागात कोरडाच दुष्काळ पडल्याने आधिच त्यांचे कंबरडे मोडले गेले आहेत तर तालुक्यातल्या बहुतांश भागात सिंचनाची सुविधा असल्यामुळे त्यांनी कशीबशी धानाची शेती लावली मात्र पाऊसाने त्यांनाही चांगलाच दगा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. मात्र सुदैवाने शेतकऱ्यांना या खरीप हंगामात हलके स्वरुपाचे धानाचे उत्पन्न बऱ्यापैकी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांने शेतातील हलके धान कटाई सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या युती शासनाने धान आधारभूत केंद्रावर प्रती क्विंटल १४७० रुपये दर निश्चित केले व बोनस २५० रुपये जाहिर केला. परंतू शासनाने अद्यापही धान आधारभूत केंद्र सुरुच केले नाही. तर इकडे दिवाळी सारखा सण आवासुन उभा आहे. त्यामुळे शेतकरी हा पैसे उभारणीकरिता नाईलाजास्तव निघालेले हलके धान हा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारभुत किंमतीपेक्षा कवडीमोल भावात विक्री करताना दिसत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ेय दलाल व व्यापाऱ्यामार्फत धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांची गरज ओळखून त्या शेतकऱ्यांकडून हजार रुपये ११०० रुपये तर कधी ९०० रुपये प्रति क्विंटल धान खरेदी केलया जात असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. हेच हलके धान जर आधारभूत केंद्रावर दिले असते तर शेतकऱ्याला प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये मिळाले असते या उपर बोनस ही मिळाला असता तो वेगळा तुमसरातल्या बहुतांश आधारभूत केंद्राच्या एजेन्सी तसेच विविध कार्यकारी सोसायटी ह्या घोट्याळात अडकले आहेत. त्यामुळे तिथे आधारभुत केंद्र सुरु करणे शक्य नाही. पंरतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच जर धान आधारभूत केंद्र सुरु केल्यास शेतकरी आधारभूत केंद्रावर जमा करेल व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागणार नाही. करिता शासनाच्या लोकप्रतिनिधीने काळाची गरज ओळखून तत्काळ आधारभूत केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)