शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीककर्ज वाटपात "लेटलतीफ"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 00:16 IST

पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असतानाही शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटप अल्प प्रमाणातच होत आहेत.

शेतकरी चिंतातूर : उद्दिष्टपूर्तीची अपेक्षा, कर्ज वाटपात जिल्हा बँक अग्रेसर!देवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असतानाही शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटप अल्प प्रमाणातच होत आहेत. जिल्हा सहकारी बँक व बँक आॅफ इंडियाचा अपवाद वगळता उर्वरित राष्ट्रीयीकृत बँकांनी खरीप पीककर्ज वाटप फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. यावर्षीच्या खरीपात ५४५.४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी अर्थव्यवस्था ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे विद्यमान "व्यवस्था" शेतकऱ्यांचा जणू "अर्थ"च काढून घेत आहे. यात निसर्गाचा लहरीपणा अधिकच भर टाकत आहे. इतरांना भरभरून देणारा, स्वत:च्या घामरुपी सिंचनातून अन्नधान्याचे उत्पादन करणारा देशाचा पोशिंदा शेतकरी स्वत: मात्र शोषित जिणे जगत असल्याची विदारक स्थिती आहे. गत चार वर्षांपासून निसर्गाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रबीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. धानाचे उत्पादन घटले; मात्र बाजारभावही यावर्षी कमी आहेत. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीककर्जरूपी कुबड्यांच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक आॅफ इंडिया, ग्रामीण बँक या बँकांचा अपवाद वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बँका फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी काटकसर करावी लागत आहे.५४५.४० कोटींचे लक्ष्यांकयंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ५४५ कोटी ४० लाख रुपयांचा लक्ष्यांक आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेला २८९.७५ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकाना २०६.२५ कोटी व ग्रामीण बँकाना ४९.४० कोटी असा लक्ष्यांक आहे. कर्जमाफी चर्चेचे "साईड इफेक्ट"गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा जिल्ह्यासह राज्यात पेटला आहे. सर्वच राजकीय पक्षांसह शेतकऱ्यांनीदेखील कर्जमाफीसाठी आवाज बुलंद केला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात कर्जमाफीचा निर्णय झाला. या सर्व चर्चेमुळे अनेक नियमित शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार झालेत. कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.गतवर्षी उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षाभंग गेल्यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४९५ कोटी रुपये खरीप पीक कर्ज मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, यातील ४०४.१६ कोटी रुपयांचेच कर्ज वाटप करण्यात आले होते. उर्वरित ९०.८४ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नव्हते. यावर्षी १०० टक्के कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. शासनाचे आदेश असूनही बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. खरीप पीक कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे. आतापर्यत जिल्हा बँकेने ५० टक्केपर्यत कर्ज वाटप केलेले आहे. राष्ट्रीयकृत बँकानी जवळपास १३ टक्के कर्ज वाटप केलेले आहेत. पावसाचे आगमन होताच कर्ज वाटप कार्याला अधिक वेग असतो. कर्ज वाटपाविषयी साप्ताहिक आढावा घेतला जात आहे.-विजय बागडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, भंडारा.