शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात नांदतो सर्वधर्मियांचा एकोपा

By admin | Updated: September 2, 2015 00:20 IST

भारतात सर्वधर्मिय वास्तव्य करतात. अपवादात्मक घटना वगळता सर्वधर्मिय गुण्यागोविंदाने राहत असल्याने जगाच्या पाठीवर विविध संस्कृती भारतात बघायला मिळतात

जनगणना २०११ नुसार हिंदू १० लाख, बौध्द १.५ लाख, मुस्लीम २६ हजारांच्या घरातदर १० वर्षांनी होते जनगणनाभंडारा : भारतात सर्वधर्मिय वास्तव्य करतात. अपवादात्मक घटना वगळता सर्वधर्मिय गुण्यागोविंदाने राहत असल्याने जगाच्या पाठीवर विविध संस्कृती भारतात बघायला मिळतात. भंडारा जिल्ह्यातही १० लाखांवर हिंदू बांधव वास्तव्य करीत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बौध्द बांधवांची संख्या येत असून मुस्लीम बांधवांची संख्या २६ हजारांच्या तर अन्य अल्पसंख्यांक समाजातील ख्रिश्चन, जैन व अन्य बांधवांचेही येथे वास्तव्य आहे.दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचे काम सुरू असताना विविध संघटना तसेच सामाजिक संस्थांनी नागरिकांना जातीचा उल्लेख करण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर जनगणना प्रगणकाकडे जातीचा उल्लेख करून माहिती भरण्यात आली. त्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने हा डाटा तयार केला आहे. शहरातील चमक-धमक म्हणा किंवा रोजीरोटीची साधने, मात्र ग्रामीण जनता शहराकडे ओढली जात आहे. हेच कारण आहे की, ग्रामीण क्षेत्रात जेथे लोकसंख्या वाढ फक्त ४.२१ टक्के झाली, तिथेच शहरी क्षेत्रात ५७.५२ टक्के वाढ झाली आहे. ही नोंद जिल्ह्यात सन २००१ व सन २०११ या दशकाच्या जनगणनेत करण्यात आली आहे. धर्मनिहाय बघितल्यास ग्रामीण क्षेत्रात मुस्लीम, शिख, जैन, बौद्ध व अन्य धर्मियांत चांगलीच घट झाल्याचे दिसते. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाख ३३४ नोंदविण्यात आली आहे. यात ९ लाख ६६ हजार ५०३ लोक ग्रामीण तर दोन लाख ३३ हजार ८३१ लोक शहरी क्षेत्रात असल्याचे नोंद आहे. यात ६ लाख ५ हजार ५२० पुरुष तर ५ लाख ९४ हजार ८१४ महिलांचा समावेश आहे. यातील ४ लाख ८७ हजार ४८४ ग्रामीण भागात पुरुष तर ४ लाख ७९ हजार ०१९ महिलांचे वास्तव्य आहे. शहरी भागात १ लाख १८ हजार ०३६ पुरुष तर १ लाख १५ हजार ७९५ महिला वास्तव्यास आहे.जिल्ह्यात हिंदू बांधवांची १० लाख ९ हजार ३५२ लोकसंख्या असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बौध्द बांधव असून त्यांची संख्या १ लाख ५४ हजार ४५८ इतकी नोंदविण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम बांधव असून त्यांची लोकसंख्या २६ हजार ५०२, ख्रिश्चन बांधवाची संख्या २ हजार १४५ तर शिख बांधवाची संख्या ८३१ तर जैन धर्मिय बांधवांची संख्या १०१७ असल्याची नोंद २०११ मध्ये घेण्यात आलेल्या जनगणनेनुसार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जनगणनेदरम्यान २ हजार ४७४ लोकांनी धर्म सांगितलेला नाही. त्यात ५३० शहरी तर १९४४ ग्रामीण क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. यात एक हजार २९६ पुरूष व १ हजार १७८ महिलांनी आपला धर्म सांगीतलेला नाही. यासोबतच तीन हजार ५५५ नागरिकांचा जातीधर्माबाबत माहिती नसल्याचे सांगितले आहे. यातील ५६२ शहरी भागातील नागरिकांचा तर २९९३ ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे. यात १ हजार ७९० पुरुष तर १ हजार ७६५ महिलांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)शिख व जैन समाज कमीभंडारा जिल्ह्यात शिख व जैन धर्म अत्यंत कमी आहे. जिल्ह्यात शिख धर्मीय केवळ ८३१ व जैनधर्मीय १०१७ असल्याची नोंद आहे. भंडारा तालुक्यात सर्वाधिक ४०२ तर तुमसर तालुक्यात २३८ व साकोली येथे १३७ जैन बांधवांची नोंद करण्यात आली असून अन्य तालुक्यांत हा आकडा १०० पेक्षा कमी आहे. याच प्रकारे शिख धर्मिय भंडारा येथे २९२ तर पवनी येथे १७७ असून अन्य तालुक्यात त्यांची लोकसंख्या १०० पेक्षा कमी असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. विकास यंत्रणा विभागाने शासनाला सादर केला आहे. विविध जाती धर्माचे नागरिकांच्या भंडारा जिल्ह्यात सर्वधर्मियांचा एकोपा कायम आहे.