शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी पदाच्या परीक्षेत परीक्षार्थ्यांवर अन्याय

By admin | Updated: August 31, 2015 00:31 IST

तलाठी पदाच्या सरळसेवा भरती २०१५ अंतर्गत १३ सप्टेंबरला म्हणजे वैदर्भीय सण मारबत, तान्हा पोळ्याच्या दिवशी घेतली जाणार आहे.

मारबत, तान्हा पोळ्याला होणार परीक्षा : शेकडो विद्यार्थिनीही मुकणारतुमसर : तलाठी पदाच्या सरळसेवा भरती २०१५ अंतर्गत १३ सप्टेंबरला म्हणजे वैदर्भीय सण मारबत, तान्हा पोळ्याच्या दिवशी घेतली जाणार आहे. विदर्भात सगळीकडे मारबतीची रॅलीची धुमधाम असते. परिणामी दळणवळणाची साधनेही त्या दिवशी बंदच असतात. नेमक्या त्याच दिवशी पदभरतीची परीक्षा ठेवल्याने विदर्भाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रया उमटत आहे.विदर्भात ७० टक्के नागरिक हे शेतीवरच उपजिविका करणारे आहेत. त्यामुळे पोळा या सणाला संपुर्ण विदर्भात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या दिवशी शेतकरी बैलांना पुजतो. पोळा संपला की कितीतरी कर्मचारी सुट्यावर जाणार, त्यामुळे मनुष्यबळाची कमतरताही जाणवू शकते. मात्र आदेश धडकल्याने कदाचीत कर्मचारी उपस्थित राहतील. पंरतू त्या दिवशी सर्व उपहार गृहे चहाटपऱ्या, हॉटेल आदी बंदच राहत असल्याने शिक्षक कर्मचाऱ्याची गैरसोय होईल.दुसऱ्या दिवशी सकाळी मारबत व सायंकाळी तान्हा पोळयाचे आयोजन केले जाते. मारबतीच्या दिवशी शहरात, गावोगावी, गल्लीबोळ्यात मिरवणूक काढली जाते. शहरासह सर्वत्र बंदसदृश वातावरण असत. बँड, वाजे, डिजेच्या तालावर तरुण मंडळी थिरकताना दिसतात. अशा परिस्थितीत महिलांना घराबाहेर निघणे जरा जिकरीचे होत असतांना पद भरतीची परीक्षा ठेवल्यास त्या मिरवणूकीचा त्रास तर संभवतोच मात्र त्या दिवशी दळणवळणाची साधणे आॅटो, रिक्षा, बस व इतर मिळणे ही कठीनच असल्याने जिल्हयातून व जिल्हा बाहेरील विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचणार कसे, असा सवाल आहे. सदर तलाठी पद भरतीची परीक्षा ही शाळा, कॉलेज महाविद्यालये अशा ठिकाणीच घेतल्या जाणार आहे. परिणामी या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याकरिता पर्यवेक्षक, समवेक्षक, केंद्रप्रमुख, भरारी पथक इत्यादी कर्मचारी मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्याकरिता जिल्हधिकारी कार्यालये तसेच शाळा कॉलेजचे शिक्षक मुख्याध्यापक यांची नियुक्ती होणार. पोळा सण असल्याने यापैकी या सर्व बाबीचा प्रशासनाने गांभिर्याने विचार करावा व विदर्भीय जनतेच्या भावनाचा तसेच तलाठी पदाच्या परीक्षा उमेदवाराच्या हिताच्या दृष्टिकोनातून व महिलेच्या सुरक्षाचा विचार करुन मारबतीच्या दिवशी घेण्यात येणारी परीक्षा पुढे किंवा मागे ढकलून विदर्भाच्या परीक्षार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)पोलिसांवरही अतिरिक्त तणावपोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा या दिवशी मारबत मिरवणूकही असते. मिरवणुकीत विशेष काळजी घेण्याचे कार्य पोलीस प्रशासनावर असते. पोळा सणामुळे पोलीस सलग दोन दिवस तणावाखाली असतात. त्यात भर म्हणून तलाठी पदाची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर लागणारा बंदोबस्त त्यात महिला पोलिसांनाही जुंपणार आहेत. अशा स्थितीत जर एखादया मिरवणुकीत दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण? असाही प्रश्न उद्भवतो. परिणामी कुठलीही परिक्षेची तिथी ठरविताना भविष्यकालीन घटनांवर किंवा ठरविलेल्या तारखांवर विचारविमर्श केला जातो. परंतु या परीक्षेसाठी मंडळाने विचार केलेला दिसत नाही.