शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
3
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
4
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
5
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
7
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
8
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
9
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
10
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
11
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
12
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
13
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
14
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
15
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
16
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
17
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
18
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
19
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

खातेदारांची वाढ; बँक कर्मचाऱ्यांत कपात

By admin | Updated: June 28, 2014 23:26 IST

४७ गावांची प्रमुख बाजारपेठ, राष्ट्रीयकृत बँकात खाते उघडण्याचे शासनाचे धोरण, यामुळे सिहोरा गावात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकाच्या अभावाने खातेदारांची कोंडी होत आहे. गावात बँकांच्या शाखा

चुल्हाड (सिहोरा) : ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ, राष्ट्रीयकृत बँकात खाते उघडण्याचे शासनाचे धोरण, यामुळे सिहोरा गावात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकाच्या अभावाने खातेदारांची कोंडी होत आहे. गावात बँकांच्या शाखा वाढविण्याची ओरड असताना सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
सिहोरा परिसरात अंदाजे पाऊण लक्ष लोकसंख्या आहे. ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असल्याने नागरिकांची वर्दळ याच गावात आहे. नागरिकांचा रोजचा संपर्क बँकेसोबत आहे. या बँकात दिसणारी गर्दी नाकीनऊ आणत आहे. परंतु नागरिकांचा नाईलाज आहे. सकाळपासून नागरिकांची गर्दी बँकाच्या दारावर दिसून येत आहे. मध्यंतरी लिंकफेल झाल्यास खातेदारांना चक्रावून सोडत आहे. यात दोष बँकेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा नाही, व्यवस्थापनाचा आहे. नियोजनकर्त्यांचा आहे.
बँकेत खातेदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. शासनाचे धोरण, योजनांची अंमलबजावणी, यामुळे एका व्यक्तीचे बँकेत ३-४ बचत खाते आहेत. या खात्याचा उपयोग योजनापुरताच आहे. नंतर मात्र राशीचा दुष्काळ आहे. एकच बचत खाता अन्य योजनांना जोडण्याचे धोरण शासन स्तरावर राबविण्यात येत नाही. यामुळे नागरिक भ्रमित आहेत. या गावात राष्ट्रीयकृत बँक आॅफ इंडिया ही एकमेव शाखा आहे. या शाखेत कर्मचारी अल्प आहेत. सुरुवातीपासून तितकेच टेबल आहेत. खातेदार वाढत असताना टेबल मात्र वाढले नाहीत. हेच खरे कारण आहे.
खातेदारांची गर्दी बघून कर्मचाऱ्यांना रोज घाम फुटत आहे. परंतु कुणी गाऱ्हाणे ऐकणारे नाहीत. या बँकेत व्यावसायीक, विद्यार्थी, पेन्शनधारक, रोहयो, बचतगट तथा अन्य खातेदारांचा महापूर आहे. सकाळी ८ वाजेपासून खातेदार बँकेच्या दारावर तळ ठोकून उभे राहत असतात.
अन्य बँकांची हीच अवस्था आहे. या बँकाच्या कामकाजात वाढ झाली आहे. वाढत्या कामाच्या व्यापाने विश्रांती घेणारी सुटी आता कर्मचाऱ्यांना दिसेनाशी झाली आहे. बँकांच्या बाबतीत सिहोरा परिसरावर अन्याय होत असल्याचे खुद्द कर्मचारीही ठासून सांगत आहेत. या त्रासदायक प्रश्नावर मात्र लोकप्रतिनिधी शांत आहेत. एरवी जनआंदोलनासाठी चर्चेत असलेल्या सिहोरा परिसरात मात्र बँकांच्या वाढीसाठी कधी आवाज निघाला नाही. यामुळे खातेदारांना कधी अच्छे दिन दिसणार किंवा नाही असा प्रश्न पडला आहे.
तुमसरात बँकांचा पाऊस आहे. परंतु धानाचे उत्पादन घेणाऱ्या सिहोऱ्यात मात्र बँकेच्या नव्या शाखेसाठी ओरड सुरू आहे. याकडे वरीष्ठांनी लक्ष द्यावे.(वार्ताहर)