शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात रुग्णांचे हाल

By admin | Updated: October 14, 2015 00:44 IST

पवनी तालुक्यातील अड्याळ हे २० हजार लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर सन २००५ मध्ये ग्रामीण रुग्णालयात झाले.

रिक्त पदांचा घोळ कायम : स्कॅन मशीन धूळ खात, अड्याळ येथील प्रकारविशाल रणदिवे अड्याळपवनी तालुक्यातील अड्याळ हे २० हजार लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर सन २००५ मध्ये ग्रामीण रुग्णालयात झाले. यासाठी एक कोटी रुपये खर्च करुन सुसज्ज व देखणी ईमारत बांधण्यात आली. परंतु सद्यस्थितीला रिक्त पदांचा घोळ व सुविधांच्या अभावामुळे या रूग्णालयात रूग्णांचे हाल होत आहेत.रूग्णालयाची इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर रुग्णालय सुरु नाही होत म्हणून येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले होते. एकंदरीत उद्घाटनापासून ते आजपावेतो या रुग्णालयात एक ना अनेक समस्या कायम आहेत. या रुग्णालयाकडे लोकप्रतिनिधींचेही तेवढेच दुर्लक्ष होत गेले. ज्या आनंदी वातावरणात ज्या हेतूने मोठ्या वास्तुचे उद्घाटन झाले तो हेतू पूर्ण झालेला दिसून येत नाही. शासनाच्या दृष्टीकोनानुसार या ग्रामीण रुगणालयाची स्थापना झाली खरी परंतु याचा लाभ रूग्णांना कमीच मिळत आहे. काही कर्मचारी रुग्णावर तर काही रुग्ण येथील कर्मचाऱ्यांवर चिडताना दिसतात. कारण एकमेव असते येथील असुविधा. भर उन्हाळ्यात एका रुग्णाचे स्वत:घरचा कुलर लावला होता. रुग्णाना यात कधी पाणी नाही तर कधी घाणीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.अडयाळ व परिसरातून रोज शेकडो रुग्ण या ग्रामीण रुग्णालयाची पायरी चढतात. मात्र रुग्णालयच आजारी असेल तर रुग्णांना काय लाभ होणार? शवविच्छेदन वेळेवर होत नाही. त्यासाठी बाहेरुन स्विपरला पाचारण करावे लागते. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असणार. सोनोग्राफीची नवीन मशीन २०१२ पासुन धूळ खात पडली आहे. आॅपरेटर नसल्याने त्याचा उद्घाटनाचा मुहूर्त अद्यापही गवसलेला नाही. या ग्रामीण रूग्णालयात एनसीडी योजनेअंतर्गत असंसर्गजन्य रोग उपचारार्थ ६ पदे मंजुर असून एकाच्या भरवश्यावर काम केल्या जात आहे. भंडारा येथील सामान्य रुग्णालयात अड्याळ ग्रामीण रुग्णालयातील २ कर्मचारी काम करताना आढळतात. पोष्टींग अड्याळला आणि वर्कींग भंडारा असे चित्र सध्या पाहावयास मिळते. लोकप्रतिनिधी येतात समस्या लवकर सुटतील, एवढे दोन शब्द बोलून निघून जातात. परंतु समस्या ‘जैसे थे’ असे चित्र आहे.अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आणि वाढत्या रुग्णांमुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना तर त्रास होतोच पंरतु त्यापेक्षा सर्वात जास्त त्रास इथे येणाऱ्या रुगणांना होताना दिसतो. याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.