शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारंटाईन बाहेर पडल्यास गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून ४३ आणि मुंबई-पुणे व इतर महानगरातून सहा हजार ४२७ व्यक्ती दाखल झाले आहेत. या सर्वांची रॅपीड रिस्पांस टीमने भेट घेऊन आरोग्यविषयक सूचना दिल्या. यापैकी विदेशातून आलेल्या २९ आणि महानगरातून आलेल्या सहा हजार ४२७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : डबलसिट दुचाकी वाहनेही चालान होणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विदेश आणि महानगरातून आलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र काही जण हातावर शिक्का असतानाही बाहेर पडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. आता होम क्वारंटाईन व्यक्त घराबाहेर पडल्यास त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले आहे.भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून ४३ आणि मुंबई-पुणे व इतर महानगरातून सहा हजार ४२७ व्यक्ती दाखल झाले आहेत. या सर्वांची रॅपीड रिस्पांस टीमने भेट घेऊन आरोग्यविषयक सूचना दिल्या. यापैकी विदेशातून आलेल्या २९ आणि महानगरातून आलेल्या सहा हजार ४२७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात आला आहे. परंतु यातील काही मंडळी हातावर शिक्का असतानाही घराबाहेर निघत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव अशा व्यक्तीमुळे पसरण्याची अधिक भीती असते. त्यामुळे त्यांना घरातच राहण्याचे निर्देेश देण्यात आले आहेत. परंतु यातील काही व्यक्ती घराबाहेर निघत आहेत. त्यामुळे कोरोनसदृशस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे होम क्वारंटाईन व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला फिरण्याची परवानगी देण्यात आली. परंतु अद्यापही दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती दुचाकीवर फिरत असल्याचे दिसत आहे. अशा दुचाकी वाहनांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे तसेच त्यांच्यावर चालान देण्यासह कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले आहेत.आता किराणा दुकान २४ तास सुरुसंचारबंदीच्या काळात जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी किराणा दुकाने २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले आहे. सध्या किराणा दुकान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र आता ही दुकाने सलग २४ तास सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच औषधी दुकाने, दूध, भाजीपाला, गॅस सिलिंडर आदी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.चार व्यक्ती आयसोलेशन वॉर्डातभंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात १४ व्यक्ती असून यापूर्वी पाच जणांना सुटी देण्यात आली आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात चार रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठककोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी पोलीस अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी, इतर विभाग प्रमुखांची बैठक रविवारी जिल्हापरिषद सभागृहात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद मोटघरे उपस्थित होते.सोशल डिस्टन्स्ािंग अनिवार्यकिराणा व भाजीपाला विकत घेण्यासाठी आलेल्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तालुकास्तरावर परदेश, परराज्य व जिल्हा असा क्रम लावण्यात आला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. या कामासाठी लष्कराची सेवासुद्धा घेण्यात येणार आहे. कोब्रा बटालियनमध्ये क्वारंटाईन सुविधा उपलब्ध आहे. तेथील क्वारंटाईन टीमसाठी दोन पोलीस नियुक्त करण्यात येणार आहे. सर्व मुख्याधिकाºयांनी सोशल डिस्टन्सिंगचे योग्य नियोजन करावे. असे आवाहन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी