शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

होम क्वारंटाईन बाहेर पडल्यास गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:00 AM

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून ४३ आणि मुंबई-पुणे व इतर महानगरातून सहा हजार ४२७ व्यक्ती दाखल झाले आहेत. या सर्वांची रॅपीड रिस्पांस टीमने भेट घेऊन आरोग्यविषयक सूचना दिल्या. यापैकी विदेशातून आलेल्या २९ आणि महानगरातून आलेल्या सहा हजार ४२७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : डबलसिट दुचाकी वाहनेही चालान होणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विदेश आणि महानगरातून आलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र काही जण हातावर शिक्का असतानाही बाहेर पडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. आता होम क्वारंटाईन व्यक्त घराबाहेर पडल्यास त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले आहे.भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून ४३ आणि मुंबई-पुणे व इतर महानगरातून सहा हजार ४२७ व्यक्ती दाखल झाले आहेत. या सर्वांची रॅपीड रिस्पांस टीमने भेट घेऊन आरोग्यविषयक सूचना दिल्या. यापैकी विदेशातून आलेल्या २९ आणि महानगरातून आलेल्या सहा हजार ४२७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात आला आहे. परंतु यातील काही मंडळी हातावर शिक्का असतानाही घराबाहेर निघत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव अशा व्यक्तीमुळे पसरण्याची अधिक भीती असते. त्यामुळे त्यांना घरातच राहण्याचे निर्देेश देण्यात आले आहेत. परंतु यातील काही व्यक्ती घराबाहेर निघत आहेत. त्यामुळे कोरोनसदृशस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे होम क्वारंटाईन व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला फिरण्याची परवानगी देण्यात आली. परंतु अद्यापही दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती दुचाकीवर फिरत असल्याचे दिसत आहे. अशा दुचाकी वाहनांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे तसेच त्यांच्यावर चालान देण्यासह कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले आहेत.आता किराणा दुकान २४ तास सुरुसंचारबंदीच्या काळात जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी किराणा दुकाने २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले आहे. सध्या किराणा दुकान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र आता ही दुकाने सलग २४ तास सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच औषधी दुकाने, दूध, भाजीपाला, गॅस सिलिंडर आदी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.चार व्यक्ती आयसोलेशन वॉर्डातभंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात १४ व्यक्ती असून यापूर्वी पाच जणांना सुटी देण्यात आली आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात चार रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठककोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी पोलीस अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी, इतर विभाग प्रमुखांची बैठक रविवारी जिल्हापरिषद सभागृहात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद मोटघरे उपस्थित होते.सोशल डिस्टन्स्ािंग अनिवार्यकिराणा व भाजीपाला विकत घेण्यासाठी आलेल्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तालुकास्तरावर परदेश, परराज्य व जिल्हा असा क्रम लावण्यात आला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. या कामासाठी लष्कराची सेवासुद्धा घेण्यात येणार आहे. कोब्रा बटालियनमध्ये क्वारंटाईन सुविधा उपलब्ध आहे. तेथील क्वारंटाईन टीमसाठी दोन पोलीस नियुक्त करण्यात येणार आहे. सर्व मुख्याधिकाºयांनी सोशल डिस्टन्सिंगचे योग्य नियोजन करावे. असे आवाहन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी