शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कालौघात गावरान आंबा दुर्मिळ

By admin | Updated: April 30, 2015 00:35 IST

कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना ....

बेसुमार वृक्षतोड कारणीभूत : आमराई झाली इतिहासजमा
जवाहरनगर : कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना आंबाच्या रसाचा पाहुणचार करण्याची प्रथा होती. ग्रामीण भागात गावरान वाणाचा आंब्याचा रस म्हणजे पर्वणी ठरत असे. मात्र कालौघात बेसुमार प्रमाणात झालेली वृक्षतोड व जळाऊ लाकूड म्हणून होत असलेला वापर यामुळे ग्रामीण भागातून आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
ग्रामीण संस्कृतीचा एक अंग असलेला गावरान आंबा व रस आता दुर्मिळ झाला आहे. सासरी गेलेली मुलगी वर्षातून दोन वेळा माहेरी येते, ते म्हणजे दिवाळी, भाऊबीज आणि अक्षयतृतीयानंतर आंब्याच्या रसाला. हा संस्कृतीचा एक भाग म्हणून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच वृक्षतोडीने गावरान आंबा इतिहासजमा होत आहे.
ग्रामीण भागात असलेल्या अनेक आमराया या वृक्षतोडीने नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आमराईत गप्पांची मैफल, आंब्याला बहर आला की त्याचा दुरवर पसरणारा सुगंध आता दुरापास्त झालेल्या दिसत आहेत. आंब्याच्या रसाचे निमित्त करून मुलीसोबत जावयांना बोलावून पुरणपोळी, यासह गावरान आंब्याचा रस, त्यावर खमंग तुपाची धार हा पाहूणचार विदर्भाची परंपरा राहिली आहे. ग्रामीण भागातील आंब्याचे प्रकारही अनेक प्रचलित होते. गावातील एखाद्या लहान मुलाला विचारले तरी तो अमूक झाडाचा आंबा गोड की आंबट हे निरखून सांगायचा. आमराईत पाडावरचे आंबे खाण्यासाठी मुलांची होणारी पळापळ, फांद्यावर टोळक्याने खेळायचा डाबडुबली आणि कडक उन्हात आंब्याच्या थंडगार सावलीत बसून रंगणाऱ्या गप्पा आता कालबाह्य झाल्या आहेत.
आंब्याच्या झाडांची कत्तल सुरु असल्यामुळे प्रतिष्ठेचे लक्षण समजल्या जाणाऱ्या आमराया दुर्मिळ झाल्या आहेत. पूर्वीच्या काळी आमराईवरुन श्रीमंती ठरत असे. आता मात्र कालौघात या बाबी लोप पावत आहेत. (वार्ताहर)

इंधनाकरिता होतो वापर
संगणकाच्या युगात आमराईत बसून गप्पा मारताना कुणी दिसत नाही. स्पर्धेच्या काळात पुस्तकाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांना तर डाबडुबली हा खेळ काय याची माहिती नसल्याने त्यातील गंमत हरवत आहे.