शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कधारकांची वनाधिकाऱ्यांकडे नोंद नाही

By admin | Updated: September 11, 2014 23:18 IST

केंद्र शासनाच्या परिपत्रकान्वये अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक रहिवाशांना वननिवासी कायद्याअंतर्गत १३ डिसेंबर २००५ च्या पूर्वी किमान तीन पिढ्यापासून वास्तव्य व खऱ्या अर्थाने गरजांसाठी

आलेसूर : केंद्र शासनाच्या परिपत्रकान्वये अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक रहिवाशांना वननिवासी कायद्याअंतर्गत १३ डिसेंबर २००५ च्या पूर्वी किमान तीन पिढ्यापासून वास्तव्य व खऱ्या अर्थाने गरजांसाठी वनावर किंवा वनजमिनीवर अवलंबून असणाऱ्या वनहक्क धारकांना पारदर्शक निर्गमित केलेल्या समिती अंतर्गत वनहक्क प्रदान करण्यात आले. परंतु निकाली काढलेल्या दात्यांची नोंद त्यांच्या वनातील वनाधिकाऱ्यांना माहित नसल्यामुळे खरे लाभार्थी वंचित आहेत. परिणामी कायद्याच्या चौकटीत बघ्याची भूमिका व अनाधिकृत अतिक्रमण धारकांना संथीचे सोने ठरत आहे. कायद्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यात वैक्तीक दाण्यासाठी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी या अंतर्गत १९,५१५ दावे वनहक्क समितीकडे प्राप्त झाल्याची नोंद आहे. त्यापैकी ग्रामसभेने २२९ दावे स्थानिक स्तरावर फेटाळले. त्यानंतर वनहक्क समितीने १९.२८६ दावे उपविभागीय स्तरीय समितीकडे पाठविले या समितीने १६,६५५ दावे त्रृटी अभावी अमान्य करून २,६३१ दावे जिल्हा स्तरीय समितीच्या सुपूर्द केले व फेटाळलेल्या दाव्यासंबंधी वनहक्क धारकाला फेटाळण्याचा पुरावा मागणू ६० दिवसात अपील करण्याची संधी दिली. जिल्हास्तरीय समितीत ३८९ दावे अमान्य करून २१८० दावे मंजूर केले. त्यामुळे जिल्ह्यात वैयक्तीक २,१८० दावे कायद्याअंतर्गत पात्र ठरले. टक्केवारी अंतर्गत ११.३ टक्के दावे यशस्वी झाले. जिल्ह्यात सामुहिक दाव्यासंबंधी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक तलावावर मत्स्यपालन उपजिवीकेच्या स्त्रोतामार्फत वनहक्क सादर केले. मात्र संबंधित महसूल विभागामार्फत निस्तार हक्काच्या आधारे सबळ पुरावे देण्यात काम कुचरपणा बाळगल्यामुळे व निरक्षर व अल्पशिक्षीत वनहक्क धारकाने अपिल व खटाटोप न करता परावलंबी धोरण आत्मसात केल्याने जिल्ह्यातील एकही सामुहिक वनहक्क धारकाला वनतलाव मंजूर झाला नाही.तुमसर तालुक्यात एकूण ३५२७ व्यक्तीक दावे व २१ सामूहिक दावे दाखल करण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार त्यापैकी ४०३ व्यक्तीक वनहक्क दावे मान्य झाले व कित्येक दावे आजही प्रलंबित आहे. सामूहिक दाव्या अंतर्गत एकही दावा मान्य नसल्याचे कळले आहे. मात्र रितसर ग्रामपंचायतीला किंवा सामुहिक दाव्यापैकी एका व्यक्तीला नोटीस तामील करण्यात आले नाही. नुकताच १५ आगस्ट २०१३ रोजी तहसील कार्यालयातच उपविभागीय कार्यालय प्रारंभ झाल्यामुळे तुमसर व मोहाडी तालुके जोडण्यात आले आहे. परिणामी प्रथम भंडारा येथे उपविभागीय कार्यालय असल्यामुळे प्रलंबित दावे कुठे आहेत या संदर्भात संबंधित विभागातील कर्मचाऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात वन अतिक्रमण कायम असून संबंधित विभागाच अनिभिज्ञ आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना या संबंधी विचारणा केली असता पात्र व अपात्र वनहक्क धारकांची यादी नसल्यामुळे अनाधिकृत अतिक्रमण हरविण्यात विभागाला तारेवरची कसरत होत असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)