शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंच नामधारी, नवरेच खरे सत्ताधारी

By admin | Updated: July 12, 2014 23:29 IST

राजकीय क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने ५० टक्के वाटा देऊन त्यांच्यासाठी प्रगतीची दारे उघडी केली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत महिलांची संख्या वाढली आहे.

बारव्हा : राजकीय क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने ५० टक्के वाटा देऊन त्यांच्यासाठी प्रगतीची दारे उघडी केली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत महिलांची संख्या वाढली आहे. मात्र महत्वाच्या पदावर महिला आरुढ असताना सुद्धा पतीदेवच कारभारी असल्याचे दिसून येते. महिला सरपंच पदावर असल्याने त्यांचे पतीदेव अर्थपूर्ण काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
लाखांदूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २१ आॅक्टोबर २०१२ मध्ये झाल्या. संबंध तालुक्यात ५१ सरपंच पदापैकी थेट २७ महिला सरपंच विविध प्रवर्गांतर्गत राखीव करण्यात आले. त्यामध्ये नामाप्र (महिलासाठी) ०८, अनु. जाती साठी (महिला) ०६, सर्वसाधारण (महिला) १२ व अनु. जमाती महिला १ अशी २७ सरपंचाची पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली.
महिलांचा सामाजिक राजकीय आणि सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने मागील काही वर्षापासून महिलांसाठी विविध योजनांची आखणी शासनाने केली आहे. महिला सक्षमीकरणाचे मुद्दे असो की त्यांचे बचत गट असो. महिलांना पुरुषांच् या बरोबरीने आणण्यासाठी शासन सातत्याने पुढाकार घेत आहे.
महिलांनी राजकीय क्षेत्रातील सत्तेची चावी आपल्या हातात घेतली पाहिजे. परंतु महिलांच्या अज्ञानामुळे किंवा जोखीम न स्वीकारण्याच्या संकुचित प्रवृत्तीमुळे अनेक महिला नवऱ्यांच्याच हाती सत्तेची चावी देतात आणि स्वत:ला पूर्ण अधिकार असूनही अगदी कठपुतळीप्रमाणे त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात. नाही तर त्यांना शिविगाळ करून मारहाण केल्याचेही किस्से ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे नवरा म्हणेल तेच महिला सरपंचाला करावे लागत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रकार उजेडात आले.
अशा अशिक्षित महिला सरपंचांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. कारण जिथे आयुष्यभर चुल आणि मुल हे सूत्र स्वीकारून संसार केला त्या बाईला राजकारण काय कळणार? याचा अर्थ असा होतो की ती केवळ नामधारी सरपंच राहते. ग्रामपंचायतचा कारभार करणारे खरे कारभारी हे दुसरेच असतात. म्हणजे इथेही पुरुषप्रधान संस्कृतीच अप्रत्यक्षपणे सत्ता भोगत असते, हे नाकारता येत नाही. त्यामुळे राजकारणात महिलांना संधी देऊनही त्यांचे पतीच कारभार हाकत असतील तर महिलांना स्वातंत्र्य मिळाले काय?