शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पाल्यांची शहराकडे धाव

By admin | Updated: July 10, 2014 23:27 IST

भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते. आज येथील शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाचे चुकीचे धोरण

निसर्ग कोपला : उदरनिर्वाहासाठी धावपळ, शेती झाली बेभरवशाची
बारव्हा : भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते. आज येथील शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाचे चुकीचे धोरण आणि निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा नाहक बळी पडावा लागत आहे. शेतकऱ्यांचे होणारे सततचे हाल यामुळे शेतकरीपुत्रांनी शेतीकठे पाठ फिरविली असून कामाच्या शोधात त्यांनी शहराकडे धाव घेतली असल्याचे चित्र सध्या लाखांदूर तालुक्यात दिसून येत आहे.
देशाची अर्थव्यवस्था कृषी उत्पादनावर आधारलेली असल्याचे म्हटले जाते. देशाला कृषीप्रधान देश तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधले जाते. आज शेती व शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. शेतकरी कर्जाच्याबोज्यात भरडला जात आहे. यात धान उत्पादक शेतकऱ्यांची अधिकच अधोगती झाल्याचे चित्र दिसत आहे. सततच्या नापिकी व वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे धान उत्पादक शेतकरी आत्महत्येला कवटाळत आहे. याला शासनाचे धोरणच कारणीभूत ठरत असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
शासन उद्योगक्षेत्राला अधिक प्राधान्य देत असून शेतकऱ्यांची मात्र घोर उपेक्षा केली जात आहे. बजेटमध्ये केवळ कृषीकरिता चार टक्के निधी निर्धारित केली जाते. ही देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. देशात महागाईने कळस गाठला आहे. शेतीउत्पादीत मालाला भाव नाही. मातीमोल भावाने धान्याची विक्री करावी लागते. वाढती शेतमजुरी, रासायनिक खते, किटकनाशके यांच्या भाव वाढीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. उत्पादन खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. सतत अस्मानी आणि सुलतानी संकटांना सामोरे जात हाडाचे काडी व रक्ताचे पाणी करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेण्याची आशा बाळगून शेती करतो. मात्र शेतकऱ्यांचे दुर्भाग्य म्हणावे की काय नियती त्याचा पाठलाग करणे सोडतच नाही. यावर्षी पावसाने तब्बल एक महिन्यापासून दडी मारून बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हे सगळे करूनही पाऊस आला नाही. तलही गेले, तुपही गेले, हाती आले धुपाटणेच अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात मोठे कोणतेही उद्योग नाहीत. धान हे प्रमुख पिक असून यावरच शेतकऱ्याची उपजिविका आहे. येथे धानावर आधारित उद्योग निर्मितीची गरज आहे. यासाठी जिल्ह्याचे खासदारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोणतेही उद्योग नसल्याने व शेती परवडण्यासारखी नसल्याने शेतकरीपुत्र रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबईसारख्या शहरात जावून रोजगार करण्यासाठी जात आहेत. (वार्ताहर)