शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित

By admin | Updated: July 10, 2014 23:26 IST

यावर्षी पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेने महागड्या बियाणांची पेरणी केली. आता ती वाया जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले.

भंडारा : यावर्षी पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेने महागड्या बियाणांची पेरणी केली. आता ती वाया जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे.
मागीलवर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर केंद्र शासनाची चमू येऊन पाहणी केली. त्यानंतर तत्कालीन कृषीमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा करुन मदत घोषीत केली. त्यावेळी भंडारा जिल्ह्याला ४७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी वाटपासाठी देण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ४७ कोटी ५० लाख रुपये त्या-त्या तालुक्यांना वितरीत करण्यात आले.
यामध्ये भंडारा तालुक्याला ७ कोटी २४ लाख ७० हजार, पवनी तालुक्याला ७ कोटी २२ लाख ६९ हजार, तुमसर तालुक्याला ६ कोटी ६० लाख, मोहाडी तालुक्याला ६ कोटी ३० लाख १८ हजार, साकोली तालुक्याला ४ कोटी ४९ लाख ६८ हजार, लाखनी तालुक्याला ६ कोटी २३ लाख ३६ हजार, लाखांदूर ९ कोटी ३९ लाख ६८ हजार असे एकूण ४७ कोटी ५० लाख २९ हजार रुपये वितरीत करण्यात आले. सर्वच तालुक्यातील तहसील कार्यालयांना रक्कम पाठविण्यात आली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यांच्या तक्रारी वाढत असल्या तरी अनेकांकडे खाते क्रमांक नाही, काहींचा संपर्क क्रमांक नाही, काहींचे आपसी वाद आहेत. त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
यासंदर्भात साकोलीचे तहसीलदार हंसा मोहणे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ९५ टक्के लोकांना पैसे वाटप करण्यात आले असून केवळ २२ लाख रुपये शिल्लक आहे. ८०० ते ९०० शेतकऱ्यांमध्ये काहींकडे खाते नाही, काही परगावी राहत आहेत. काहींचे फेरफारमध्ये वारसान चढविण्यात आले नाही. त्यामुळे ही रक्कम शिल्लक आहे.
पवनीचे तहसीलदार दिलीप आखाडे म्हणाले, ७.२२ कोटी रकमेपैकी ६.४० कोटी रुपये वाटप करण्यात आली आहे. ऊर्वरीत रक्कम बँकेतील खात्याअभावी राहिलेली असल्याचे सांगितले.
खुटसावरी येथील शेतकरी नरेंद्र पोटवार म्हणाले, यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मागील वर्षी झालेल्या नुकसानीची अद्यापही आर्थिक मदत देण्यात आली नाही. परिणामी यावर्षी शासनाच्या मदतीची अपेक्षा कशी करायची? खरीप हंगामात अतिवृष्टी आणि रब्बीमध्ये गारपीट कोसळूनही मदत मिळू शकली नाही. ही मदत कधी मिळेल?
खुटसावरी येथील शेतकरी कन्हैया भुते म्हणाले, मागीलवर्षी निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके मातीमोल झाली. नुकसान भरपाई म्हणून शासनाने आर्थिक मदत घोषितही केली. मात्र अद्यापही ही मदत बँकेच्या खात्यात पोहचलेली नसल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)