शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ म्हणतात, हृदयाला जिवापाड जपा

By admin | Updated: November 10, 2014 22:39 IST

मानवी आयुष्यात मेंदूसोबतच हृदयाचे स्थानदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. एकवेळ योग्यवेळी मेंदूला काही आठवले नाही किंवा कुठला त्रास झाला तर जीवननौका तरून जाईल, मात्र जर हृदय काही क्षणांसाठी

भंडारा : मानवी आयुष्यात मेंदूसोबतच हृदयाचे स्थानदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. एकवेळ योग्यवेळी मेंदूला काही आठवले नाही किंवा कुठला त्रास झाला तर जीवननौका तरून जाईल, मात्र जर हृदय काही क्षणांसाठी जरी बंद पडले तर तो आयुष्याचा शेवट ठरू शकतो. अगदी काही मिनिटे अगोदर आपल्याशी हसून बोलणाऱ्या व्यक्तीचा हृदयविकाराचा जोरदार झटका आल्यास क्षणात जीव जाऊ शकतो. आपल्या देशात सर्वाधिक नैसर्गिक मृत्यू हे हृदयविकारामुळेच होतात. त्याचप्रमाणे हृदयाशी संबंधित असलेले रोग हे केवळ वृद्धापकाळातच होतात असेही नाही. गेल्या काही वर्षांपासून तर तरुणांमध्येदेखील याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अगदी पंचवीशीपर्र्यंतच्या युवकांनादेखील हृदयविकाराचा झटका आल्याची उदाहरणे दिसून येतात. याला आनुवंशिकता वगैरे कारणे असली तरी सवयी व जीवनमानदेखील याला तितकेच जबाबदार आहेत. आजच्या धकाधकीच्या युगात इकडून तिकडे धावपळ करताना शरीराकडे योग्य लक्ष द्यायला वेळच राहत नाही. मात्र आजचे हे दुर्लक्ष भविष्यात मोठी समस्या ठरू शकते हे निश्चित. त्यामुळे योग्य वेळी योग्य काळजी घेणे हाच यावरचा उत्तम उपाय आहे.आहारावर नियंत्रण हवे : आपल्या आहारावर सुरुवातीपासूनच नियंत्रण हवे. आहारातही जर शिस्त जपली तर प्रकृतीला ते फार फायदेशीर ठरू शकते. आहारात जास्तीत जास्त ताज्या व कच्च्या भाज्या, फळे यांचे सेवन करावे. तेलकट, तूपकट, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढेल असे पदार्थ जास्त खाणे तर टाळावेच. त्याचप्रमाणे मीठ, साखर, तिखट यांचा उपयोग देखील मर्यादित प्रमाणातच करावा . जंकफूड्स, अतिप्रमाणात मद्यसेवन हृदयासाठी घातक ठरू शकते.नो स्मोकिंग - धूम्रपानावर नियंत्रण ठेवले तर मोठा त्रास वाचू शकतो. विशेष म्हणजे अतिधूम्रपानामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका यामुळे वाढू शकतो.व्यायाम हवाच - हृदयविकार होऊ नये याकरिता सर्वात उत्तम उपाय म्हणजे रोज सकाळी उठून व्यायामाची सवय. धावपळीच्या जीवनातदेखील व्यायामासाठी वेळ काढणे चांगले. सकाळच्या ताज्या व प्रसन्न हवेत चालल्याने शरीरालादेखील नवा उत्साह मिळतो. त्याचप्रमाणे प्राणायाम, योग हेदेखील हृदयविकार टाळण्यात मदत करतात. पोहण्यासारखा व्यायामदेखील शरीराला फायदेशीर ठरू शकतोतणाव टाळा - मनावर कुठल्याही गोष्टीचा ताण येणे स्वाभाविक आहे . मात्र जर तणाव आला तर त्याच गोष्टीचा जास्त विचार करू नका. एखाद्या दुसऱ्या कामात किंवा चांगल्या गोष्टीत लक्ष घाला. जर तेही शक्य नसेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ तणाव मोकळा करा. जर एखाद्या वेळी फार तणाव वाटत असेल किंवा चिडचिड वाटत असेल तर दीर्घश्वास घ्या व आकडे मोजा. असे पाच ते दहा मिनिटे केल्यावर तुम्हाला ताण हलका झाल्यासारखे वाटेल. तसेच जर आजूबाजूला कुठले बाळ असेल तर त्याच्याशी खेळल्याने किंवा बोलल्याने तणाव कमी होण्यास नक्की मदत मिळेल.नियमित तपासणी - जर तुम्हाला हृदयाचा त्रास असेल किंवा हृदयाजवळ दुखत असेल अथवा कुठला लहानसा त्रास वाटत असेल तरी डॉक्टरकडे जाण्याचे टाळू नका. हृदयाची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच पन्नाशी ओलांडल्यावर तर वर्षातून दोनदा तरी संपूर्ण तपासणी केली तर उत्तम.योग्य झोप हवी - शरीराला आरामाची देखील नितांत गरज असते. सात तासांची झोप घेणे आवश्यकच आहे. जर झोप पूर्ण झाली नाही तर हृदयावर ताण येऊ शकतो. काळजी घ्या.. (शहर प्रतिनिधी)