शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

सणासुदीत शेतकऱ्यांच्या घामाला अपेक्षित दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 5:00 AM

भंडारा जिल्हा धानपिकासोबत भाजीपाल्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र निसर्गाच्या दृष्टचक्रात येथील शेतकरी अडकला आहे. महापूर आणि अतिवृष्टीने धान उद्ध्वस्त झाले. आता शेतकऱ्यांची आशा केवळ भाजीपाला पीकावर आहे. मात्र काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याला योग्य दर मिळत नव्हते. मात्र गत आठ दिवसात चित्र पालटले. भाजीच्या दरात तेजी आली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. चांगले बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी तारले आहे.

ठळक मुद्देभाजीपाला उत्पादक सुखावला : किमान महिनाभर असाच दर मिळावा अशी आशा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाचा दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना सध्या भाजीपाला पिकाने उभारी दिली आहे. दसरा - दिवाळीच्या पर्वात शेतकऱ्याच्या घामाला अपेक्षीत दाम मिळत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी सुखावला असून किमान महिनाभर असाच दर मिळेल असा अंदाज येथील बीटीबी सब्जीमंडीत व्यक्त केला जात आहे.भंडारा जिल्हा धानपिकासोबत भाजीपाल्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र निसर्गाच्या दृष्टचक्रात येथील शेतकरी अडकला आहे. महापूर आणि अतिवृष्टीने धान उद्ध्वस्त झाले. आता शेतकऱ्यांची आशा केवळ भाजीपाला पीकावर आहे. मात्र काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याला योग्य दर मिळत नव्हते. मात्र गत आठ दिवसात चित्र पालटले. भाजीच्या दरात तेजी आली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. चांगले बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी तारले आहे. सध्या भंडारा येथील बीटीबी सब्जीमंडीत घाऊक दरात वांगे ३० - ३७ रुपये, मिरची ५०- ६०रुपये, सांभार ५० - ८० रुपये, टोमॅटो ३० - ३५ रुपये, चवळी ४० ते ५० रुपये, कारले ४५ - ५० रुपये, गवार ८० रुपये, पत्ताकोबी ३० रुपये, भेंडी ३०-३५ रुपये प्रती किलो दराने व्यापारी खरेदी करीत आहे.बीटीबी सब्जीमंडीच्या व्यापारी वर्गाने आखलेली दुरदृष्टी शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरत आहे. जिल्ह्यात भाजीपाला विकुन इतर जिलह्यातही पाठविला जातो. त्यामुळे बाजारात चांगला भाव मिळत आहे. योगायोगाने मागणी अधिक व पुरवठा कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगले दिवस आले आहे. कोरोनसारख्या महामारीत बीटीबी सब्जीमंडीने शेतकऱ्यांना एकप्रकारे मदतीचा हात दिला आहे. बीटीबी सब्जीमंडी शेतकऱ्यांच्या हक्काची असून शेतकरी येथे विश्वासाने माल घेऊन येतात. सध्या भाजी बाजारात योग्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायद्याचे ठरत आहे. भाजी उत्पादकांच्या प्रगतीत बीटीबीचा मोठा सहभाग आहे.शेतकरी हा आमचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करतो. बीटीबीत शेतकरी भाजी विकुण रोख पैसे घेवून जातो. त्यांच्या घामाला सध्या चांगला दर मिळत आहे. इतर शेतकऱ्यांनीही भाजीपाला पिकाकडे वळावे.- बंडू बारापात्रे,अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी, भंडाराशेतकरी वर्गाला चांगले दिवस बीटीबी मुळे आले आहे. नजरेसमोर भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत आहे. मी कारल्याचे उत्पादन करीत असून ४५ ते ५० रुपये प्रती किलो दर मिळत आहे. सणासुदीच्या काळात हे चित्र आशादायी आहे.- प्रकाश मस्के,शेतकरी डव्वा धारगाव

टॅग्स :Farmerशेतकरी