शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याचा दुरुपयोग करु नका

By admin | Updated: June 25, 2014 23:37 IST

कायदे हे जनतेच्या हितासाठी असून त्याचा उपयोग जनतेच्या जनकल्याणासाठी व्हावा, इतरांना त्याचा त्रास होणार नाही यासंबंधी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे विचार न्यायमूर्ती पी.बी. वराडे यांनी

विधी सेवा समितीचे आयोजन : पी.बी. वराडे यांचे प्रतिपादन
पवनी : कायदे हे जनतेच्या हितासाठी असून त्याचा उपयोग जनतेच्या जनकल्याणासाठी व्हावा, इतरांना त्याचा त्रास होणार नाही यासंबंधी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे विचार न्यायमूर्ती पी.बी. वराडे यांनी न्यायमंदिर पवनी येथे आयोजित विधी सेवा समिती व वकील संघ पवनीद्वारा आयोजित मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले.
न्यायमूर्ती वराडे पुढे म्हणाले की, राज्यघटना ही मार्गदर्शक असून तिचा सम्मान व्हावा, आबालवृद्ध, महिला, बालमजूर यांच्या संरक्षणार्थ कायद्याची भूमिका महत्वपूर्ण आहे. शिक्षणाच्या कायद्याचा सदूपयोग झाला पाहिजे. महिलांना योग्य न्याय मिळाला पाहिजे यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती वराडे बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भागवत आकरे, सेंट्रल बँकेचे मॅनेजर फडके होते. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्याचा नेहमी सन्मान करावा तसेच कोर्टाची पायरी आपण चढणार नाही अशी दक्षता जनतेने घेतल्यास अनेक वादविवाद मार्गी लागू शकतात, असे विचार डॉ. भागवत आकरे यांनी व्यात केले.
आपसी मित्रत्वाच्या, भाऊबंदकीच्या नात्यातून व प्रेमळ स्वभावातून विचारांच्या आदानप्रदानामुळे अनेक समस्या सुटू शकतात. त्याकरीता कोर्टात जाण्याची देखील आवश्यकता भासणार नाही असे विचार सेंट्रल बँकेचे मॅनेजर फडके यांनी व्यक्त केले.
संचालन व आभारप्रदर्शन अ‍ॅड. देवीदास तुळसकर यांनी केले. यावेळी लोकअदालतचे आयोजनदेखील करण्यात आले. न्यायमूर्ती पी.बी. वराडे, अ‍ॅड. देवीदास तुळसकर, सामाजिक कार्यकर्ता डॉ. भागवत आकरे यांनी पॅनलचे कामकाज पाहिले. ४९ पैैकी १२ खटल्यांचा निपटारा यावेळी करण्यात आला. दिवानी व फौजदारी कोर्टाचे लिपिक किरण मेश्राम, कडव, उके, बन्सोड, इंगोले यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)