शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मतभेदामुळे रखडला गावाचा विकास

By admin | Updated: October 8, 2014 23:22 IST

पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे गावाचा विकास रखडला आहे. गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गावातील

पालोरा (चौ.) : पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे गावाचा विकास रखडला आहे. गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गावातील नाल्या घाणीने तुडूंब आहेत. लक्षावधी रुपये खर्च करून विकत घेतलेले सौरउर्जेचे दिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे शोभेची वास्तू ठरत आहेत. येथील सरपंच संगीता गिऱ्हेपुंजे या मनाप्रमाणे खर्च दाखवीत असल्यामुळे ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.येथील सरपंचाच्या मनमर्जी कारभाराने सारेच त्रस्त झाले आहेत. सरपंच, उपसरपंच एका बाजूला तर सात सदस्य विरुद्ध बाजूने असल्यामुळे बिल पास करण्यात प्रशासकीय कामे करण्यात सरपंचाची गोची होत आहे. येथे महिला सरपंच असली तरी मात्र त्यांचे पतिदेव कारभार सांभाळीत असल्याचा आरोप आहे. उपसरपंच दिलीप धारगावे हे दे ्नधक्का प्रमाणे भूमिका करीत आहेत. सरपंचाची विकासात्मक कामात बघ्याची भूमिका पाहून ते लवकरच पायउतार होण्याचे चिन्ह दिसत आहेत. याबाबत विरोधी सदस्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे बोलले जात आहे. पालोरा हे परिसरातून मध्यभागी असून जवळपास दोन हजार लोकवस्तीचे आहे. नवसदस्यांनी भरलेली ही ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे सुरु आहे. ग्राम पंचायत सदस्यात रस्सीखेच सुरु आहे. येथील सरपंच गावातील खर्चाचे बिल स्वमर्जीने काढणे, ग्राम पंचायत कार्यालयामध्ये पतिदेवाची उपस्थिती ठेवणे, ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा वापरणे, गावात विकासात्मक कामाकडे दुर्लक्ष करणे, मी म्हणेन तो कायदा अमलात आणणे आदी कारणामुळे ग्रा.पं. पदाधिकारी त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांना पाणी पुरवठा करणारी लाखो रुपयाची नळ योजना नियोजनाअभावी धूळ खात पडली आहे, याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. नाव मोठे दर्शन खोटे अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. गावातील स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी नाकाला रुमाल बांधावे लागते. स्वत:च्या दोन्ही कडेला घाणच नघाण पाहायला मिळत आहे. ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे हा गाव विकासापासून कोसो दूर आहे. संबंधित लोकप्रतिनिधींने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)