शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:00 AM

उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमीकलयुक्त पद्धतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : फळे खरेदी करताना दक्षता घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसल्याने जिल्हाबाहेरुन येणाऱ्या फळांची आवक मंदावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रसायनांचा वापर करून पिकविलेली फळे विक्रीसाठी बाजारात येत असल्याने रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमीकलयुक्त पद्धतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत.अनैसर्गिक पद्धतीने फळांवर रसायनांचा वापर वाढत असल्याने अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने ठिकठिकाणच्या फळविक्रेत्यांकडून तपासणी करण्याची गरज आहे.गत काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात एक टरबूज फुटून स्फोट झाल्याची घटना घडली होती. यावरून फळांमध्ये केमीकलचा तसेच विविध रसायने वापरून त्वरीत बाजारपेठेत विकण्याची स्पर्धाच सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.नागरिकांनी फळे विक्री करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असताना महामार्गावरुन परतणारे मजूर, वाहनधारक अनेकदा फळे खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी फळ विक्रेत्यांनी फिजीकल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा वापर करण्याची गरज आहे.मात्र अनेक ठिकाणी फळविक्रेते याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नैसर्गिकरित्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळ पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे कलींगड, खरबूज, आंबा, चिकू यासारखी फळे जिल्ह्यातील अनेक शेतकºयांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकºयांच्या फळांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. फळ उत्पादक शेतकºयांना मोठा दिलासा मिळू शकतो. लॉकडाऊन काळात अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी स्टॉलवर विक्रीसाठी असणारी फळे अनैसर्गिकरित्या पिकविलेली आहेत. हे माहिती असतानाही अनेकदा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.फळांच्या मागणीत लक्षणीय वाढउन्हाळ्याच्या दिवसांमुळे ग्राहकांकडून फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र अनेक ठिकाणी सुरु असलेल्या अनैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या फळांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य