शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहर झाले ‘हागणदारीमुक्त’

By admin | Updated: October 15, 2016 00:33 IST

राज्य शासनाने नगरपालिकांसाठी हागणदारीमुक्त योजना राबविली होती.

राज्य शासनाने गौरविले : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदानभंडारा : राज्य शासनाने नगरपालिकांसाठी हागणदारीमुक्त योजना राबविली होती. यात भंडारा शहराने नामांकन मिळविले. शहर हागणदारीमुक्त झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत एका कार्यक्रमात भंडारा पालिकेच्या कार्याची दखल घेवून पालिकेच्या अधिकाऱ्यांना गौरविले. हागणदारीमुक्त गाव योजनेप्रमाणेच नगरपालिका असलेल्या शहरांनाही हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने मागील वर्षी हागणदारीमुक्त शहर ही योजना राबविली. या योजनेत राज्यातील प्रत्येक नगरपालिकांनी सहभाग घेतला. त्यादृष्टिने भंडारा नगरपालिकेने शहर सुंदर व स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला. त्यादृष्टिने नगराध्यक्ष बाबू बागडे व तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांच्या मार्गदर्शनात पालिकेचे सर्व नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेवून शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी ठेवलेले उद्दिष्ट्य पालिका प्रशासनाने गाठल्याने याची दखल राज्य शासनाने घेतली.राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारीमुक्त झालेल्या सर्व पालिकांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १३ आॅक्टोबरला मुंबईत पार पडला. भंडाराचे तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र देवतळे व विद्यमान मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी हा पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमाला प्रधान सचिव मनिषा मैसकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्व नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र देवतळे, मुख्याधिकारी अनिल अढागळे व पालिकेचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्यामुळे हे यश मिळाल्याचे नगराध्यक्ष बाबू बागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)