शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

कृषी विभाग म्हणतो, आठ हजार हेक्टरवरच नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 6:00 AM

भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीचा पाऊस झाला. संपूर्ण धान पीक आडवे झाले. कापणी झालेले कडपे ओले होऊन लोंब्यांना अंकुर फुटले आहे. शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनाम्यासाठी बहुतांश गावात कर्मचारी पोहोचले नाही. दरम्यान कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी प्राथमिक नजर अंदाज अहवाल शासनाला सादर केला.

ठळक मुद्देप्राथमिक अहवाल : परतीच्या पावसाचा जिल्हाभर फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीच्या पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले असले तरी कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतात पंचनाम्यासाठी कर्मचारीच पोहोचले नाही. तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित कोणत्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे विम्याचा लाभ मिळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे.भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीचा पाऊस झाला. संपूर्ण धान पीक आडवे झाले. कापणी झालेले कडपे ओले होऊन लोंब्यांना अंकुर फुटले आहे. शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनाम्यासाठी बहुतांश गावात कर्मचारी पोहोचले नाही. दरम्यान कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी प्राथमिक नजर अंदाज अहवाल शासनाला सादर केला. त्यात जिल्ह्यातील सात तालुक्यात आठ हजार ८० हेक्टर नुकसान झाल्याचे म्हटले आहे.प्रत्यक्षात जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असताना २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधित पावसामुळे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला. त्यात जिल्ह्यात बाधित गावांची संख्या ४५४ नमूद करण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात एक लाख ९१ हजार २४१ हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी आठ हजार ८० हेक्टरचे नुकसान झाले असून ३३ टक्क्यांच्या आत १९८१ हेक्टर आणि ३३ टक्क्यांच वर ६०९९ हेक्टर असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.खरीपाचा सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत होते. नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने धान पिकाला जीवदान मिळाले. कमी कालावधीचा साधारण धान दिवाळीपुर्वी कापणीला आला. शेतकऱ्यांनी कापणीतून पुंजणे तयार केले.कडपा वाळण्यासाठी साधारण आठ दिवसाचा कालावधी लागतो. याच सुमारास परतीचा पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. शेतात पाणी साचले.ढगाळ वातावरणामुळे कडपा ओल्या राहून त्याला अंकुर फुटले. पावसामुळे अनेक ठिकाणचे धान काळे पडले असून बाजारात त्याला कवडीची किंमत नाही.

टॅग्स :agricultureशेती