शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
5
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
6
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
7
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
8
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
11
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
12
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
13
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
14
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
15
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
19
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
20
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरानंतर मिरची, वांग्याचे भाव पुन्हा सावरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

शेतकरी सुखावला : ढगाळ वातावरणाचा परिणाम. पालांदूर : डिसेंबर महिन्याचे आरंभापासून भाजीपाल्याचे दर सुमार घसरलेले होते. यामुळे शेतकरी वर्गाचा ...

शेतकरी सुखावला : ढगाळ वातावरणाचा परिणाम.

पालांदूर : डिसेंबर महिन्याचे आरंभापासून भाजीपाल्याचे दर सुमार घसरलेले होते. यामुळे शेतकरी वर्गाचा बाजारात नेण्याचा खर्चसुद्धा निघणे कठीण होता. परंतु गत आठ दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याची आवकवर परिणाम झाल्याने व मागणी कायम असल्याने वांगे व मिरची च्या दरात बर्‍यापैकी भाव वाढ झालेली आहे.

पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत १६६ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतकरी शेतीत सर्वच पीक घेतात. सुमारे २०० हेक्‍टर पर्यंत मक्याची लागवड नियोजित आहे. ११९० हेक्टर उन्हाळी धानाचा हंगाम आहे. तर काही हेक्टरवर कडधान्याची लागवड आटोपलेली आहे. खरिपाचा हंगाम शेवटच्या टोकाला असून मळणी संपल्या सारखीच आहे. मात्र धान खरेदी केंद्रावर धान विक्रीच्या दीर्घ प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक धान खरेदी केंद्रावर त्याच्या कार्यक्षमतेने नुसार सुमारे २० हजार क्विंटल पर्यंत धानाची खरेदी आटोपलेली आहे. पहिल्या टप्प्यातील धानाचा निधी आला असून दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा कायम आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत धान मोजणी चा अंतिम मुहूर्त ठरलेला आहे. यातून सुटका मिळावी व दररोज नगदी रुपये हातात यावे या दूरदृष्टीने चुलबंद खोऱ्यातील शेतकरी सुमार प्रगतीवर आहे. बागायती शेतीत वांगे ,मिरची यांचे दर बऱ्यापैकी सरसावलेले आहेत. शनिवारी आठवडी बाजारात वांगे चिल्लर भावात चाळीस रुपये किलोच्या दराने तर मिरची ४० ते ५० रुपये दराने विकल्या गेली. हा दर कायम राहिल्यास बागायतदारांना अधिक नफ्याची आशा देणारा ठरणार आहे.

मिरची चा व्यापारी हा सुद्धा हायटेक झाला आहे. बीटीबी मुळे व्यापारी वर्गात खरेदी करता स्पर्धा तयार झाली असून यामुळे शेतकरी वर्गाला निश्चितच फायदा होत आहे. भाजीपाल्यात सुमार प्रगती साधली आहे. कृषी विभागाने पुरविलेल्या टिंबक व मल्चिंगचे अद्यावत ज्ञान व त्यात शेतकऱ्यांना मिळालेले अनुदान हेसुद्धा भाजीपाल्याच्या उत्पादनाकरिता प्रेरक ठरलेले आहेत.

बॉक्स

लाखांदूर तालुक्यातील चुलबंद काठावरील पालांदूर शेजारील खोलमारा या गावात प्रत्येक घरात भाजीपाल्याची शेती होत आहे. कारले व चवळा (शेंग)यांचे उत्पादन अख्ख्या जिल्ह्यात परिचित आहेत. गावचे सरपंच अमृत मदनकर यांनी गावाला योग्य दिशा देत घराघरात प्रगतशील शेतकरी तयार केलेला आहे. पालांदूर येथे बारमाही भाजी उत्पादक देवराम तलमले, मोहन लांजेवार, धनपाल नदुरकर, प्रकाश नंदुरकर, रमाबाई लांजेवार, सुखदेव भुसारी, विश्वास राऊत, रीना राऊत, सतीश भुसारी, मनोहर भुसारी, धनश्याम लांजेवार, हेमराज भुसारी, अभिमान भुसारी, टिकाराम भुसारी, गजानन भुसारी, अरुण पडोळे, प्रशांत खागर आदी शेतकरी पालांदूरला ताजा भाजीपाला पुरवतात. यांच्या सेवेत पालांदूर येथील कृषी मित्र शरद निखाडे, प्रशांत जांभुळकर, गजानन हटवार,नरेंद्र खंडाईत व मंडळ कृषी कार्यालय नेहमी तत्पर असतात.

कोट बॉक्स

पांढरा वांगा उत्पादित असून त्याला प्रति किलोला ४० रुपयेचा प्रति किलो दर शनिवारी आठवडी बाजारात मिळालेला आहे. पांढरा वांगा ला खूप मोठी मागणी आहे. पांढरा वांगा ही पालांदूरची भाजीपाल्याची जुनी ओळख आजही कायम आहे.

सतिश भुसारी, बागायतदार पालांदुर.