शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पूरग्रस्तांसाठी ४३ कोटी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 5:00 AM

मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्याने वैनगंगा, बावनथडी, चुलबंद या नद्यांना असलेल्या महापूराचा फटका जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार जणांचा महापूरात मृत्यू झाला होता. ८२५१ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. महापुराचा ३७८ गावातील शेतीलाही फटका बसला. २६ हजार ८१२ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना फटका बसला होता.

ठळक मुद्देराज्य शासनाचा निर्णय : १०४ गावांना बसला होता महापुराचा फटका, निधी अपुरा असल्याची पूरग्रस्तांची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून जिल्ह्यासाठी ४३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. महापूराचा जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला होता. कोट्यवधीचे नुकसान झाले असून हा निधी अपूरा असल्याची पूरग्रस्तांची भावना आहे.भंडारा जिल्ह्यात २७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अतिवष्टी आणि महापूर आला. मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्याने वैनगंगा, बावनथडी, चुलबंद या नद्यांना असलेल्या महापूराचा फटका जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार जणांचा महापूरात मृत्यू झाला होता. ८२५१ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. महापुराचा ३७८ गावातील शेतीलाही फटका बसला. २६ हजार ८१२ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना फटका बसला होता.जिल्ह्यात १९९५ साली ओढवलेल्या पुरापेक्षाही मोठी पूरपरिस्थिती उद्भवली होती. अनेक गावात, शेतामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान ना. वडट्टीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. तातडीने मदतीची विनंती केली होती. त्याअनुषंगाने बुधवारी महसूल व वनविभागाने निधी मंजूरी शासन निर्णय निर्गमित केला. मात्र हा निधी अपूरा असल्याची भावना जिल्ह्यातील पूरग्रस्तांची आहे. निधी वाढून देण्याची मागणी आहे.अशी दिली जाणार पूरग्रस्तांना मदतमत्स्यबोटी, जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज, शेतीसहाय, मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबाला मदत, पुर्णत: घरांची क्षती झाली असल्यास कपडे, भांडे, घरगुती वस्तुकरिता शेती पिकांचे नुकसान, मृत जनावरे, घरांची अशंत: पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या यासोबतच पुराने शेतात साचलेली वाळू चिकन माती, क्षार काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय तसेच नदीच्या रुपांतरामुळे झालेल्या जमीनीच्या नुकसानीसाठी सहाय, मोफत रॉकेल आदींसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नागपूर विभागातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांसाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला ४३ कोटी आले आहे.

टॅग्स :floodपूरState Governmentराज्य सरकार