शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांसाठी ४३ कोटी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 05:00 IST

मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्याने वैनगंगा, बावनथडी, चुलबंद या नद्यांना असलेल्या महापूराचा फटका जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार जणांचा महापूरात मृत्यू झाला होता. ८२५१ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. महापुराचा ३७८ गावातील शेतीलाही फटका बसला. २६ हजार ८१२ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना फटका बसला होता.

ठळक मुद्देराज्य शासनाचा निर्णय : १०४ गावांना बसला होता महापुराचा फटका, निधी अपुरा असल्याची पूरग्रस्तांची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून जिल्ह्यासाठी ४३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. महापूराचा जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला होता. कोट्यवधीचे नुकसान झाले असून हा निधी अपूरा असल्याची पूरग्रस्तांची भावना आहे.भंडारा जिल्ह्यात २७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अतिवष्टी आणि महापूर आला. मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्याने वैनगंगा, बावनथडी, चुलबंद या नद्यांना असलेल्या महापूराचा फटका जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार जणांचा महापूरात मृत्यू झाला होता. ८२५१ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. महापुराचा ३७८ गावातील शेतीलाही फटका बसला. २६ हजार ८१२ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना फटका बसला होता.जिल्ह्यात १९९५ साली ओढवलेल्या पुरापेक्षाही मोठी पूरपरिस्थिती उद्भवली होती. अनेक गावात, शेतामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान ना. वडट्टीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. तातडीने मदतीची विनंती केली होती. त्याअनुषंगाने बुधवारी महसूल व वनविभागाने निधी मंजूरी शासन निर्णय निर्गमित केला. मात्र हा निधी अपूरा असल्याची भावना जिल्ह्यातील पूरग्रस्तांची आहे. निधी वाढून देण्याची मागणी आहे.अशी दिली जाणार पूरग्रस्तांना मदतमत्स्यबोटी, जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज, शेतीसहाय, मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबाला मदत, पुर्णत: घरांची क्षती झाली असल्यास कपडे, भांडे, घरगुती वस्तुकरिता शेती पिकांचे नुकसान, मृत जनावरे, घरांची अशंत: पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या यासोबतच पुराने शेतात साचलेली वाळू चिकन माती, क्षार काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय तसेच नदीच्या रुपांतरामुळे झालेल्या जमीनीच्या नुकसानीसाठी सहाय, मोफत रॉकेल आदींसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नागपूर विभागातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांसाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला ४३ कोटी आले आहे.

टॅग्स :floodपूरState Governmentराज्य सरकार