शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

Nirjala ekadashi 2021: निर्जला एकादशीचे व्रत करा आणि उर्वरित तेवीस एकादशींचे पुण्य मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 12:29 IST

Nirjala ekadashi 2021: ऐन पावसाळ्यात या व्रतांचे आयोजन हे समाजभान राखण्याच्या दृष्टीनेच केले असावे. 

ज्येष्ठ मासातील आणखीन एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी. यंदा २१ जून रोजी म्हणजे येत्या सोमवारी निर्जला एकादशी आहे. हिला `भीमसेनी एकादशी' असेही म्हणतात. यासंबंधीची एक कथा आहे.

भीमाला भूक आवरत नसे. साहजिकच इच्छा असूनही तो उपवास करू शकत नव्हता. त्यामुळे खिन्न होऊन एके दिवशी त्याने आपली ही व्यथा व्यासांना सांगून उपाय विचारला. त्यावेळेस व्यासांनी त्याला `निर्जला एकादशी' चे व्रत करण्याचा सल्ला दिल. ही एकच एकादशी केल्याने इतर तेवीस एकादशी केल्याचे फळ मिळते. त्याप्रमाणे भीमाने ही एकादशी आनंदाने आणि भक्तीपूर्वक केली. 

गुजरातमध्ये या एकादशीला भीम एकादशी असे दुसरे नावही प्रचलित आहे. तशीच आणखीन एक प्रथाही गुजराथी मंडळी पाळतात. ती म्हणजे अजीर्ण-अपच या शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळावी, म्हणून या दिवशी उपास करतात. शिवाय भीमाचे नाव घेऊन दिवसभरात शक्य होईल तेवढ्या वेळा पोटावरून हात फिरवायचा. मात्र ही प्रथा केवळ गुजरातपुरतीच मर्यादित आहे. 

संपूर्ण वर्षातील दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचे व्रत विधीपूर्वक केले, तर सर्व एकादशीचे पुण्य लाभते, अशी श्रद्धा आजही टिवूâन आहे. या दिवशी आचमनाखेरीज काहीही न खातापिता उपास करावा. रात्री विष्णूच्या मूर्तीची विधिवत पूजा करावी. गायन, नृत्य करून त्या रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णूंची यथासांग पूजा करून, गरजूंना दान दक्षिण देऊन मग उपास सोडावा. हे व्रत केल्याने दीर्घायुष्य व सुदृढ आरोग्य प्राप्त होत़े 

आजच्या धकाधकीच्या जीवनात, अनेक व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे सगळ्यांनाच हे व्रत शक्य होईल असे नाही. त्यामुळे पूर्ण अन्न पाण्याचा त्याग करून नाही, तर निदान फक्त फलाहार करून हे व्रत करण्याचा प्रयत्न करावा. 

निर्जला एकादशीचा आदला दिवस हा गंगादशहरा चा आणि दुसरा दिवस निर्जला एकादशीचा. या दोन्ही दिवसांत पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी सांगड घालून दिली आहे. जलाचे महत्त्व जाणून त्याची पूजा करावी आणि निसर्गासमोर नतमस्तक व्हावे, हा त्यामागचा शुद्ध भाव आहे.  

असे म्हणतात, की ज्याने मैलोनमैल पायी चालून पाणी भरण्याचा सराव केला असेल, त्याच्यापेक्षा जास्त पाण्याची किंमत दुसरे कोणीही समजू शकत नाही. निसर्गाने सहल उपलब्ध करून दिलेले पाणी हे नासवण्यासाठी नसून त्याची बचत करणे हे आपले कर्तव्य आहे, याचे भान करून देणाऱ्या या दोन तिथी आहेत. ऐन पावसाळ्यात या व्रतांचे आयोजन हे समाजभान राखण्याच्या दृष्टीनेच केले असावे. 

या औचित्याने गरजू लोकांना जलदानाच्या निमित्ताने छत्री, ताडपत्री, रेनकोट, उबदार कपडे यांचे दानही करता येईल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हीच तर आपल्या धर्माची खरी शिकवण आहे...!