शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

Life Lesson : वाईट लोक सगळीकडे आहेत, त्यांच्यात राहून आपल्यासाठी चांगली जागा कशी करायची ते शिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 13:23 IST

Life Lesson : या स्वार्थी जगाचा उबग येऊन दर दहा दिवसांनी आपल्याला हिमालयाची आठवण येते, पण एक हिमालय आपल्यातच आहे, तो कसा शोधायचा ते पाहू!

आपण कितीही सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या मार्गात आडवे जाण्यात लोकांना काय रस असतो ते माहित नाही. परंतु, लोकांच्या त्रास देण्याचा आपल्याला खूप त्रास होतो आणि त्याचा परिणाम कळत नकळत आपल्या आयुष्यावर होतो. त्रासलेले आपण दुसऱ्यांना त्रास देऊ लागतो आणि वाईट आचार-विचारांची श्रुंखलाच तयार होत जाते. वाईट वृत्तीच्या माणसांपासून स्वत:ला दूर ठेवावे म्हटले, तर ते सगळीकडेच असतात. अगदी आपल्या घरात, कुटुंबातही! त्यांना तोडून चालत नाही आणि स्वत: तुटून चालत नाही. यावर उपाय काय? 

ऑफिसच्या राजकारणाला, जाचाला, कुरबुरींना कंटाळलेला एक कर्मचारी वंâपनीच्या व्यवस्थापकांकडे राजीनाम्याचा अर्ज देतो. त्यांनी तो मान्य करून आपली सुटका करावी, असे कर्मचार विनवतो. व्यवस्थापक त्या कर्मचाऱ्याला राजीनामा देण्याचे कारण विचारतात. तो त्याला होणाऱ्या त्रासाची यादीच सादर करतो. व्यवस्थापक सर्व काही शांतपणे ऐकून घेतात व उपाय सांगतात, `राजीनामा देण्याआधी तुमच्यासमोर ठेवलेला, काठोकाठ पाण्याने भरलेला पेला घेऊन तुम्ही आपल्या ऑफिसच्या संपूर्ण आवारात तीन फेऱ्या मारा. फक्त पेल्यातून पाण्याचा एक थेंबही सांडणार नाही याची काळजी घ्या. नंतर मला येऊन भेटा, मी तुमचा राजीनामा मंजूर करतो.'

राजीनामा आणि ऑफिस प्रदक्षिणा यांचा परस्परसंबंध काहीही नसताना कर्मचाऱ्याने त्यांचे ऐकायचे ठरवले आणि पाण्याचा पेला घेऊन तो ऑफिस प्रदक्षिणा मारायला निघाला. 

तीन फेऱ्या कशाबशा पूर्ण करून तो व्यवस्थापकांना येऊन भेटला. तिथे आल्यावर व्यवस्थापकांनी विचारले, `आता मला सांगा, तुम्ही तीन फेऱ्या मारताना तुम्हाला कोणी वाईट बोलताना, तुमच्याबद्दल कुरबुरी करताना, राजकारण करताना, कुरघोडी करताना विंâवा एक दुसऱ्याला त्रास देताना आढळले का?'यावर कर्मचाऱ्याने नकारार्थी मान डोलावली.

व्यवस्थापक म्हणाले, `याचा अर्थ ऑफिसमध्ये या गोष्टी घडतच नव्हत्या असे नाही. परंतु, तुमचे लक्ष पाणी सांडणार नाही, याकडे होते. त्यामुळे बाकीच्या गोष्टी वाईट घडूनही तुम्हाला त्याचा त्रास झाला नाही. हेच मला तुम्हाला सांगायचे, समजवायचे होते. वाईट वृत्तीचे लोक सगळीकडे असतात. परंतु तुम्हाला तुमच्या पाण्याच्या पेल्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तसे केले, तरच तुमचा निभाव लागू शकेल. अन्यथा जिथे जाल, तिथून तुम्हाल पळच काढावा लागेल. म्हणून दुसऱ्यांना सुधारण्यापेक्षा तुम्ही स्वत:वर लक्ष केंद्रित करा आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका. तरच तुमचा निभाव लागू शकेल.'

म्हणून पुढच्या वेळी तुमच्या वाट्याला वाईट लोक आले, तरी तुमचे लक्ष पाण्याच्या पेल्यावर केंद्रित करा...!