Hanuman Jayanti 2026: लक्ष्मण-भरताची मंदिरं का नसतात? वाचा हनुमानाच्या 'अतुलनीय' देवत्त्वाचे रहस्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:50 IST2026-03-28T12:49:07+5:302026-03-28T12:50:22+5:30
Hanuman Jayanti 2026: रामायणातील सगळ्याच व्यक्तिरेखा अनुकरणीय आहेत, असे असूनही प्रभू श्रीराम आणि माता जानकी वगळता केवळ हनुमानाचेच मंदिर का? वाचा उत्तर!

Hanuman Jayanti 2026: लक्ष्मण-भरताची मंदिरं का नसतात? वाचा हनुमानाच्या 'अतुलनीय' देवत्त्वाचे रहस्य!
येत्या २ एप्रिल २०२६ रोजी प्रभू श्रीरामांचे परमभक्त पवनपुत्र हनुमानाची जयंती(Hanuman Jayanti 2026) साजरी केली जाणार आहे. रामायणात श्रीरामाच्या खालोखाल जर कोणाचे व्यक्तिमत्त्व आपल्याला सर्वात जास्त प्रभावित करत असेल, तर ते नक्कीच हनुमंताचे आहे. पण एक प्रश्न नेहमी मनात येतो— श्रीरामाच्या परिवारात लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे भाऊ होते, सुग्रीव-बिभीषणासारखे मित्र होते, मग फक्त हनुमानाचीच स्वतंत्र मंदिरं का आढळतात?
कामदा एकादशी २०२६: तुमची इच्छा पूर्ण होणार, कामदा एकादशी 'या' राशींसाठी भाग्योदय घेऊन येणार!
महर्षी वाल्मिकींच्या रामायणात हनुमानाचे चरित्र एका उत्तुंग शिखराप्रमाणे भासते. जन्मतःच सूर्याला फळ समजून झेप घेणारा हा बाल हनुमान 'न भूतो न भविष्यति' अशा पराक्रमाचा धनी आहे. परंतु, एवढा पराक्रम असूनही त्याला 'देवत्व' कसे प्राप्त झाले, याची गोष्ट रंजक आहे.
१. देवांचे वरदान आणि ऋषींचा शाप
अंजनीपुत्र हनुमान हा वायूच्या कृपेने जन्माला आला, त्यामुळे त्याच्या अंगी अफाट शक्ती होती. त्याच्या बाललीलांनी प्रसन्न होऊन अनेक देवदेवतांनी त्याला विविध वर दिले, ज्यामुळे तो अजिंक्य झाला. मात्र, या शक्तीचा वापर तो ऋषींच्या आश्रमात खोड्या करण्यासाठी करू लागला. शेवटी, ऋषींनी त्याला शाप दिला की— "जोपर्यंत कोणी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देणार नाही, तोपर्यंत तुला तुझ्या बलाचे ज्ञान होणार नाही."
२. जांबुवंताने करून दिलेली 'शक्तीची आठवण'
सीतेच्या शोधात जेव्हा समुद्र ओलांडण्याचा कठीण प्रसंग आला, तेव्हा सर्व वानरसेना चिंतेत होती. अशा वेळी 'किष्किंधाकांडात' उल्लेख आहे की, जांबुवंताने हनुमानाला त्याच्या विसरलेल्या शक्तीची आठवण करून दिली. तिथूनच खऱ्या अर्थाने हनुमानाचे बलदंड व्यक्तिमत्त्व फुलू लागले आणि त्याच्यातील गुणांचा फुलोरा हिमालयासारखा भव्य बनला.
कामदा एकादशी २०२६: रखडलेली कामे मार्गी लागतील, एकादशीला करा 'हा' विधी; मिळवा सुख-समृद्धी!
३. रामाच्या परिवारात हनुमानच 'देव' का ठरला?
श्रीरामाच्या जीवनात अनेक महान व्यक्ती होत्या:
लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न: हे रामाचे भाऊ होते, त्यांनी त्याग आणि निष्ठेचे आदर्श ठेवले.
सुग्रीव, बिभीषण, जांबुवान: हे अत्यंत पराक्रमी आणि गुणी सहकारी होते.
Tarot Card: मार्च अखेर आणि एप्रिलची सुरुवात, तुमच्यासाठी कशी असेल? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
परंतु, हनुमानाने आपली सेवा, भक्ती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. रामायणाच्या अखेरीस हनुमानाने जे 'देवत्व' प्राप्त झाले झाले, ते इतरांना मिळाले नाही. त्यामुळेच आज आपल्याला जागोजागी श्रीरामाची मंदिरे दिसतात, तशीच हनुमानाचीही स्वतंत्र मंदिरे आढळतात. लक्ष्मण किंवा भरताची स्वतंत्र मंदिरे सहसा पाहायला मिळत नाहीत, कारण हनुमानाने भक्तीच्या माध्यमातून भक्तांच्या हृदयात 'देव' म्हणून स्थान मिळवले आहे.