शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Bail Pola 2022: आज पोळ्याचा उत्सव; त्यानिमित्ताने वाचा एका शेतकरी दादाची आणि बैलांची मजेशीर गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 11:58 IST

Bail Pola 2022: बैल पोळा हा कष्टकऱ्यांचा सण आहे, रिकामटेकड्या लोकांचा नाही. याची जाणीव करून देत आहेत हे शेतकरी दादा. वाचा हा मजेशीर किस्सा!

आज ढवळ्या-पवळ्यांचा दिवस. शेतकऱ्यांशी इमान ठेवणारे हे मित्र, त्यांचा आणि पर्यायाने आपलाही उदरनिर्वाह करतात. आजच्या आधुनिक शेतीच्या काळात  त्यांचा उपयोग होत नसेलही, पण निरुपयोगी झालेली वस्तू किंवा व्यक्ती टाकून देणारा शेतकरी दादांचा स्वार्थी स्वभावही नाही. आपल्या वृद्ध माता पित्यांप्रमाणे ते पशुधनाचे संगोपन करतात. कारण कष्टकरी बैल कोण आणि बैलबुद्धीचे कोण यातला भेद ते निश्चितपणे जाणतात. यावरून एक मजेशीर किस्सा आठवला. ह.भ.प.मकरंदबुवा रामदासी यांनी कीर्तनात तो सांगितला होता.

काही कॉलेज तरुण निसर्गाच्या सान्निध्यात निवांत क्षण घालवण्यासाठी एका गावात गेले. ठिकठिकाणचे फोटो घेत, सेल्फी घेत ते एका शेतातून जात होते. त्या शेतात त्यांना उसाच्या रसाचं गुऱ्हाळ दिसलं. सूर्य डोक्यावर आला होता. घुंगराची मंजुळ खुळ खुळ कानावर पडताच तहानलेले युवक गुऱ्हाळाच्या दिशेने वळले. तिथे गेल्यावर पाहिलं, तर दोन बाक ठेवले होते. मुलांनी त्यावर मांड ठोकली. त्यांची हाश हुश ऐकून शेतकरी दादा आतल्या खोलीतून बाहेर आले. मुलांनी काही न बोलता हाताने चार फुल्लची ऑर्डर दिली. 

दादा गळ्यातल्या उपरण्याने कपाळाचा घाम टिपत परत आत गेले. पुढच्या काही क्षणांत रसाचे चार ग्लास चौघांच्या पुढ्यात ठेवले. सुमधुर रसाचा एक घोट पोटात जाताच मुलांनी मुक्त कंठाने कौतुक केलं. दादांनी स्मित करून समाधान व्यक्त केलं. अशिक्षित दिसणाऱ्या शेतकरी दादासमोर उगीच आपलं ज्ञान पाजळण्याची मुलांना हुक्की आली. ग्लास मोठा होता आणि मुलांची प्रश्नपत्रिकासुद्धा! रस प्यावा, पैसे द्यावे आणि मुकाट निघावं, ते सोडून मुलं शेतकरी दादांची शाळा घेऊ लागले. दादांचा स्वभाव शांत होता. ते नम्रपणे उत्तर देत होते.

हा तुमचा पूर्णवेळ व्यवसाय आहे का? शेत कोण सांभाळतं? उत्पन्न किती? पीक कोणतं? दुष्काळ-सुकाळ, नफा-तोटा, कुटुंब कबीला, असं सगळं काही प्रत्येकी १० रुपयांत विचारून घेतलं. शेवटी ग्लासमधला आणि बोलण्यामधला रस संपला तेव्हा कुठे मुलं पैसे देऊन जायला निघाली. 

अचानक एकाची ट्यूब पेटली, मशीनचा तर आवाज आला नाही, मग रस कसा दिला? दादा म्हणाले, माझ्याकडे लाकडी घाणा हाये नि त्याला बैल जुंपले हायेत. घाण्यात ऊस टाकला की बैल गोल गोल फिरत राहतात. रस निघतो.' त्यावर मुलांनी प्रतिप्रश्न केला, 'पण बैलांवर लक्ष ठेवावं लागत नाही का?'

शेवटी दादा आपल्या सात्विक रागावर आवर घालत म्हणाले, 'लक्ष न्हाई ठेवावं लागत, कारण अजून कालेजात जात न्हाईत ती !'

या दृष्टांतावरून आपल्यालाही बैल आणि बैलबुद्धी यातला फरक कळला असेल. तो लक्षात घ्या आणि जे कष्ट करतात, त्यांचा आदर करा, रिकाम्या चौकशा करतात त्यांचे मनोरंजन अजिबात करू नका! हा कष्टकऱ्यांचा सण आहे, रिकामटेकड्या लोकांचा नाही!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल