शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

Astrology: पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तरी विवाह शक्य असतो का? सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:38 IST

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ३

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

एखाद्याचा विवाह होण्यास विलंब होत असेल तर 'विवाहाचा योग कधी येतोय काय माहीत!' हे विधान आपण ऐकले असेल, आज ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून हा विवाह योग समजून घेऊ!

विवाह हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे, पण कित्येकांच्या आयुष्यात हा योगच येत नाही. त्यामागची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मागच्या लेखात आपण महादशा ही विवाहयोगाला कशी कारणीभूत असते ते पाहिले, आता विवाह योग पत्रिकेत आहे की नाही ते कसे जाणून घ्यायचे त्याची माहिती पाहू. 

Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं!

त्यासाठी थोडी कुंडलीची माहिती जाणून घ्या. सप्तमेश पापग्रह युक्त किंवा दृष्ट असेल, म्हणजेच ६, ८, १२ मध्ये असेल, नीच वक्री अस्तंगत असेल किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल वर वैवाहिक सौख्य मिळत नाही. सप्तमेश व्ययात असून लग्नेश किंवा राशीस्वामी सप्तमात पापग्रह दुष्ट असेल तर वैवाहिक सौख्य मिळत नाही. कारण ६, ८, १२ चे स्वामी सप्तमात असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल तर विवाह होत नाही. सप्तम भाव पापकर्तरी योगात असून शुक्र सुद्धा बिघडला असेल, म्हणजेच कन्या, सिंह राशीत असेल तरी विवाह होत नाही. लग्न कुंडलीत शुक्र सिंह राशीत आणि सिंह नवमांशात असेल तर विवाह कठीण आणि झालाच तर टिकत नाही.

सप्तम भावातील वक्री हर्शल, वक्री प्लुटो  विवाह सुखात न्यूनता आणतो. शुक्र केतू युती विरक्ती देते. वैवाहिक सौख्याची ओढ नसते. व्यय भावात पापग्रह असतील तरीही शैयासुख कमी मिळते. बुध शनीसारखे नपुंसक ग्रह सुद्धा विवाह विलंब करतात, मेष लग्नाला सप्तम भावात बुध असेल तर विवाहात अडचणी येतात. सप्तम भावात शनी केतू, शनी बुध असतील तर विवाहात अडचणी येतात, अनेकांचे होतही नाही. सप्तमेश स्वतःपासून ६,८,१२ ह्या भावात असेल किंवा त्रिक भावात असेल तरी त्रासदायक होतो. तुळेचा रवी सप्तम भावात आणि त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर विवाह जमण्यात अडचणी येऊ शकतात. 

Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!

पत्रिकेत द्वितीयेश, सप्तमेश आणि व्ययेश ह्यांचा संबंध असेल तसेच ह्याचा ६,८,१२ ह्या भावांशीसुद्धा संबंध असून त्यावर राहू शनीचा प्रभाव असेल तरीही वैवाहिक सुख न्यून मानावे लागते. अशा जातकांचे विवाह होत नाहीत. 

लग्न कुंडलीतील सप्तमेश नवमांश कुंडलीत दुषित असेल तर वैवाहिक सौख्य जवळ जवळ शून्य! सप्तम भावातील दोन पेक्षा अधिक पापग्रह असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल, तसेच ह्या स्थितीत शुक्र सुद्धा दुषित असेल तर विवाह होणे कठीण होते .

सप्तमेश त्रिक भावात आणि त्रिक भावातील कुठलाही एक किंवा दोन ग्रह सप्तम भावात आले तरीही विवाह दुरापास्त होतो. शुक्र पापग्रहांच्या युतीत , दृष्टीत , वक्री असेल तरी वैवाहिक सुखात अडचणी निर्माण होतात.

अनेकदा विरक्ती देणारा केतूचा संबंध लग्न भाव किंवा सप्तम भाव ह्याच्याशी निगडीत असेल किंवा चंद्र केतूच्या नक्षत्रात असेल तरीही जातकाला स्वतःलाच विवाह करण्याची इच्छा नसते. सप्तम स्थानाशी जर बाधकेशाचा संबंध आला तर अविवाहित राहण्याचे योग येतात. चर लग्नाला लाभेश हा बाधकेश आहे.  स्थिर लग्नाला भाग्येश हा बाधकेश आहे. द्विस्वभावी लग्नाला सप्तमेश हा बाधकेश आहे. शुक्र हा जर चंद्र आणि रवी च्या मध्ये असेल तर पत्रिका अविवाहित राहण्याकडे जाते. हे दोघेही शुक्राचे शत्रू आहेत . अशा या ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून आपण अनेक ग्रह स्थिती अभ्यासल्या.

लग्न न होण्याची इतर कारणे : 

अनेकदा कुटुंबातील जबाबदाऱ्या, लहान भावांच्या शिक्षणाच्या, विवाहाच्या जबाबदाऱ्या, आई वडिलांची जबाबदारी, आर्थिक स्थिती, घराच्या समस्या ह्यामुळे सुद्धा विवाह इतके लांबणीवर पडतात की यातच वय उलटून जाते आणि विवाह होत नाही. 

सध्याच्या युगात अनेक सामाजिक स्थित मुळे मुलांना विवाह करावेसे वाटत नाहीत अशीही उदाहरणे आहेत. एकटा जीव सदाशिव अशी स्थिती! अनेक तरुण बोलूनही दाखवतात . समाज आणि जग बदलत आहे पण तरीही मनापासून असे वाटते कि विवाह संस्था टिकली पाहिजे ...ती कमकुवत होणे आपल्या हिताचे निश्चितच नाही!

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्नrelationshipरिलेशनशिप