शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या लाॅकडाऊनमधील मदतीचे हात गेलेत कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST

सखाराम शिंदे गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी संपूर्ण देशात लाॅकडाऊन लावला होता. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य ...

सखाराम शिंदे

गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी संपूर्ण देशात लाॅकडाऊन लावला होता. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य कामगार व इतरांना काम नसल्याने खायची पंचायत झाली होती. त्यामुळे शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षाने तब्बल तीन महिने नागरिकांना घरपोहोच खाण्याची व्यवस्था व किराणा कीटसह विविध प्रकारे मदतीचा ओघ सुरू ठेवला होता. यावर्षी मदतीचे हे हात आता कुठे दिसत नाहीत.

आता पुन्हा जिल्ह्यात दहा दिवसांचा लाॅकडाऊन सुरू झाला. दुसरा दिवस उजाडला तरी अजून शहरातील सामाजिक व राजकीय पक्षाने कसलीच मदतीची व खाण्याची सोयदेखील केली नसल्याचे चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात कडक लाॅकडाऊन लावण्यात आल्याने सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. यात हातावर पोट भरणाऱ्या रोजंदारी मजूर, रिक्षाचालक, वडापाव, फळविक्रेत्यांसह अनेकांची कामे बंद झाल्याने व हाताला काम नसल्याने एकवेळची खायची पंचायत झाली होती. अशा वेळेला माजी आ.अमरसिंह पंडित याच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठानने शहरातील व ग्रामीण भागात महिनाभर पुरेल एवढ्या किराणा मालाच्या किटचे हजारो कुटुंबाला घरपोहोच वाटप केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक व्हेंटिलेटर दिले होते. तसेच संदीप मुळे व मित्र परिवाराने तीन महिने शहरातील विविध भागांत राहणाऱ्या गरीब कुटुंबाला घरपोहोच खिचडीचे वाटप केले.

संदीप पाडुळे, शिवस्वराज्य प्रतिष्ठान, शाहिनबग यांनी घरी जाऊन जेवणाची सोय केली होती. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अक्षय पवार याच्या वतीने सॅनिटाझर, मास्क व किराणा किटचे आदी मदतीचे वाटप केले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनीदेखील किराणा किटचे वाटप केले होते. तसेच युवक काँग्रेसचे श्रीनिवास बेदरे, बाळासाहेब सानप यांनीदेखील मदत केली, तर काहींनी मुक्या जनावरांच्या चाऱ्यांची सोय केली होती. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबाला या सर्वांमुळे आधार मिळाला होता. मात्र आता पुन्हा जिल्ह्यात दहा दिवसांचा लाॅकडाऊन लावण्यात आला व दुसरा दिवस उजाडला तरी शहरातील व तालुक्यातील अनेक हातांवर पोट असणाऱ्यांचे कामे बंद झाली असल्याने आता खायचे काय? असा प्रश्न या कुटुंबावर येऊन ठेपला. असे असतानाही शहरातील व तालुक्यातील एकही राजकीय पक्षाचे वा सामाजिक संघटनेचे कोणीही अजून तरी पुढे आले नाहीत. सामाजिक संघटनांनी व राजकीय नेत्यांनी तसेच कार्यकत्यांनी पुढे येऊन गरीब कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी सर्व सामान्यांमधून होत आहे.

===Photopath===

270321\20200401_174644_14.jpg

===Caption===

गेल्या वर्षीचे लॉडाऊनमध्ये गेवराईत संदिप मुळे यांच्या वतीने खिचडी वाटप झाले होते.