शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

बीडच्या ‘एसीबी’ला तक्रारींची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:16 IST

इकडे भ्रष्टाचार होतो, तिकडे लाच मागितली जाते, अशी पोकळ चर्चा सर्वच करतात. मात्र प्रत्यक्षात पुराव्यानिशी तक्रार घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाडे कोणीच जात नाही. कार्यालयाला तक्रारी येत नसल्याने कारवायांची संख्याही कमीच आहे. सध्या या कार्यालयाला तक्रारींची प्रतीक्षा असून नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन : तक्रार नसल्याने कारवायांची संख्या झाली कमी

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : इकडे भ्रष्टाचार होतो, तिकडे लाच मागितली जाते, अशी पोकळ चर्चा सर्वच करतात. मात्र प्रत्यक्षात पुराव्यानिशी तक्रार घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाडे कोणीच जात नाही. कार्यालयाला तक्रारी येत नसल्याने कारवायांची संख्याही कमीच आहे. सध्या या कार्यालयाला तक्रारींची प्रतीक्षा असून नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.भ्रष्टाचार कमी व्हावा, लाच स्विकारणाऱ्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी लाचलचुपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. बीडमध्येही पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षम टिम कर्तव्य बजावत आहे. यासच टिमने गतवर्षी ३५ लाचखोरांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे लाचखोरांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यावर्षी मात्र तक्रार देण्यासाठी नागरिकच पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.आतापर्यंत ९ महिन्यात १७ कारवाया झाल्या आहेत. कारवायांची संख्या कमी असण्यास केवळ तक्रार नसणेच कारण असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले.तक्रार आल्यानंतर आपले नाव उघड होते हा गैरसमज दूर करावा. एसीबीकडे तक्रार आल्यानंतर सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे तक्रार देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, विकास मुंडे, राकेश ठाकुर, अमोल बागलाने, प्रदीप वीर, मनोज गदळे, कल्याण राठोड, बापुराव बनसोडे, भरत गारदे, सखाराम घोलप, सय्यद नदीम, गणेश म्हेत्रे हे कार्यरत आहेत.बडे मासे गळाला : कार्यालयाची दहशतयावर्षी कारवायांची संख्या कमी असली तरी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, पुरवठा अधिकारी एन.आर.शेळके, मत्स्य कार्यालयातील मत्स्यविकास अधिकारी असे बडे मासे गळाला लागले होते. त्यामुळे बड्या अधिकाºयांमध्ये दहशत आहे.एसपी, कलेक्टरकडे तक्रारभ्रष्टाचार, लाचेच्या प्रकरणांसंदर्भात एसीबीचे कार्यालय काम करते. परंतु अशा सर्व तक्रारी या जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे नागरिक करतात. वास्तविक पाहता या सर्व तक्रारी एसीबीकडे करणे गरजेचे आहे. कारण याची सखोल चौकशी होऊन प्रकरण निकाली लागण्याची दाट शक्यता असते.......आलेल्या तक्रारीची शहानिशा करून कारवाई करतो. तसेच नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आमच्याकडून सर्वच माध्यमांतून जनजागृती व आवाहन केले जात आहे. भ्रष्टाचार संपविण्यासाठी नागरिकांनी विश्वासाने पुढे येऊन तक्रार देण्याची गरज आहे. आमच्याकडे सर्व माहिती गोपनिय ठेवली जाते.- बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उपअधीक्षक, एसीबी बीड

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस