शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

बीडच्या ‘एसीबी’ला तक्रारींची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:16 IST

इकडे भ्रष्टाचार होतो, तिकडे लाच मागितली जाते, अशी पोकळ चर्चा सर्वच करतात. मात्र प्रत्यक्षात पुराव्यानिशी तक्रार घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाडे कोणीच जात नाही. कार्यालयाला तक्रारी येत नसल्याने कारवायांची संख्याही कमीच आहे. सध्या या कार्यालयाला तक्रारींची प्रतीक्षा असून नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन : तक्रार नसल्याने कारवायांची संख्या झाली कमी

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : इकडे भ्रष्टाचार होतो, तिकडे लाच मागितली जाते, अशी पोकळ चर्चा सर्वच करतात. मात्र प्रत्यक्षात पुराव्यानिशी तक्रार घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाडे कोणीच जात नाही. कार्यालयाला तक्रारी येत नसल्याने कारवायांची संख्याही कमीच आहे. सध्या या कार्यालयाला तक्रारींची प्रतीक्षा असून नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.भ्रष्टाचार कमी व्हावा, लाच स्विकारणाऱ्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी लाचलचुपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. बीडमध्येही पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षम टिम कर्तव्य बजावत आहे. यासच टिमने गतवर्षी ३५ लाचखोरांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे लाचखोरांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यावर्षी मात्र तक्रार देण्यासाठी नागरिकच पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.आतापर्यंत ९ महिन्यात १७ कारवाया झाल्या आहेत. कारवायांची संख्या कमी असण्यास केवळ तक्रार नसणेच कारण असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले.तक्रार आल्यानंतर आपले नाव उघड होते हा गैरसमज दूर करावा. एसीबीकडे तक्रार आल्यानंतर सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे तक्रार देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, विकास मुंडे, राकेश ठाकुर, अमोल बागलाने, प्रदीप वीर, मनोज गदळे, कल्याण राठोड, बापुराव बनसोडे, भरत गारदे, सखाराम घोलप, सय्यद नदीम, गणेश म्हेत्रे हे कार्यरत आहेत.बडे मासे गळाला : कार्यालयाची दहशतयावर्षी कारवायांची संख्या कमी असली तरी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, पुरवठा अधिकारी एन.आर.शेळके, मत्स्य कार्यालयातील मत्स्यविकास अधिकारी असे बडे मासे गळाला लागले होते. त्यामुळे बड्या अधिकाºयांमध्ये दहशत आहे.एसपी, कलेक्टरकडे तक्रारभ्रष्टाचार, लाचेच्या प्रकरणांसंदर्भात एसीबीचे कार्यालय काम करते. परंतु अशा सर्व तक्रारी या जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे नागरिक करतात. वास्तविक पाहता या सर्व तक्रारी एसीबीकडे करणे गरजेचे आहे. कारण याची सखोल चौकशी होऊन प्रकरण निकाली लागण्याची दाट शक्यता असते.......आलेल्या तक्रारीची शहानिशा करून कारवाई करतो. तसेच नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आमच्याकडून सर्वच माध्यमांतून जनजागृती व आवाहन केले जात आहे. भ्रष्टाचार संपविण्यासाठी नागरिकांनी विश्वासाने पुढे येऊन तक्रार देण्याची गरज आहे. आमच्याकडे सर्व माहिती गोपनिय ठेवली जाते.- बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उपअधीक्षक, एसीबी बीड

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस