शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

कोणी बेड, कोणी व्हेंटिलेटर दिले, आम्ही तर आमचं आयुष्य देतोय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST

अविनाश कदम आष्टी : कल्पना करा, या क्षणाला मोठा तांत्रिक बिघाड झाला आणि राज्य विजेविना अंधारात बुडाले तर?, ...

अविनाश कदम

आष्टी : कल्पना करा, या क्षणाला मोठा तांत्रिक बिघाड झाला आणि राज्य विजेविना अंधारात बुडाले तर?, व्हेंटिलेटर बंद होतील, ऑक्सिजन मशीन बंद होतील, आयसीयूमधील यंत्रणा बंद पडतील अन‌् त्यावर विसंबलेले श्वासही. मात्र, वीज कर्मचारी दक्ष राहून त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. कोणी बेड दिले, कोणी व्हेंटिलेटर दिले, आम्ही आमचं आयुष्य देतोय, अशी प्रतिक्रिया वीज कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या या जीवघेण्या संकटातही महावितरणचे वीज कर्मचारी नियमांचे पालन करीत जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सेवेत असलेली सर्व काेविड रुग्णालये, ऑक्सिजन पुरवठादार कंपन्या यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घरी राहून कर्तव्य पार पाडणाऱ्या ग्राहकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, यंत्रचालक व सर्व कर्मचारी आणि बाह्यस्रोत कामगार ग्राहक सेवेत सज्ज आहेत.

शासकीय तसेच खासगी रुग्णालये, कोविडचे विशेष कक्ष, विलगीकरण कक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यावश्यक सेवांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा मिळेल, याची खबरदारी महावितरणकडून घेतली जात आहेत. महावितरणच्या घरगुती ग्राहकांना अखंडित सेवा देण्याचे काम सुरू आहे. मुख्य अभियंत्यापासून ते सहायक अभियंत्यापर्यंत व सर्व अधिकारी यासाठी आपापल्या कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी या कोरोनाच्या काळात महावितरणचे कर्मचारी कार्यरत आहेत.

रात्री-बेरात्री करावी लागतात कामे

चोवीस तासांत कधीही रात्रीच्या वेळी फोन आल्यानंतर तत्काळ दुरुस्तीसाठी जावे लागते. सोबतचे १० सहकारी पॉझिटिव्ह येऊन त्यामधील ८ जण तंत्रज्ञ पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. बाकी दोनजणांवर उपचार सुरू आहेत. आता वादळी वाऱ्यामुळे कुठे ना कुठे बिघाड होतच आहे. कमी मनुष्यबळातही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ वीज दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

- शिवाजी गोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ आष्टी.

१०० टक्के उपस्थितीतच करावे लागते काम

महावितरण कर्मचारी, अधिकारी, लाईन स्टाफने कोरोना काळात, वादळात अनेक अडचणींवर मात करत ग्राहकांना सुरळीत वीज पुरवली. वीज सेवा ही अत्यावश्यक असतानाही व संकटाच्या काळात काम करूनही त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळालेला नाही. सरकारने शासकीय कार्यालयांत १५ टक्के उपस्थिती सांगितली आहे. मात्र, महावितरण कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीतच काम करावे लागते. यामुळेच कुठे बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्त करता येते, तर आमच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

- प्रवीण पवार, उपकार्यकारी अभियंता आष्टी.

असे आहे मनुष्यबळ

आष्टी तालुक्यातील महावितरण कर्मचारी

उपकार्यकारी अभियंता १, सहायक अभियंते ५, कनिष्ठ अभियंते २, जनमित्र ७४, यंत्रचालक ६४,अतांत्रिक कर्मचारी ८.