शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंजरथकरांचे टॉवरवर ‘शोले’स्टाईल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:42 IST

तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले.

ठळक मुद्देआजी- माजी गटांचा वाद : गावाचा विकास खुंटला

माजलगाव : तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले.मंजरथ येथील सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या परराज्यात नोकरी करत असून, ग्रामपंचायतीकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीला ग्रामसेवकदेखील नाही. यामुळे येथील नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. सरपंच व ग्रामसेवकाअभावी येथून कुठलेच काम होत नाही. याविरोधात गावकºयांच्या वतीने नेहमीच उपोषणे, आंदोलने करण्यात आलेली आहेत. परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गावकºयांच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यता आले. यावेळी रमाई, पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे करा, गावातील स्वच्छता करा, गावाला पाणीपुरवठा व्यवस्थित करा, याठिकाणी ग्रामसेवकाची नियुक्ती करा आदी मागण्या ग्रामस्थांनी लावून धरल्या.पोलिसांच्या मध्यस्तीनंतर गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण यांनी तात्काळ ग्रामसेवक नियुक्त करण्याचे आश्वासन दिले.१३ महिन्यांत अनेक वेळा विरोधात आंदोलनेमाजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील ग्रामपंचायत ही सधन ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मागील पाच वर्षांपूर्वी येथील सरपंच व सदस्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विद्यमान सरपंच ऋतुजा आनंदगावकर यांनी करत यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रारीदेखील केल्या होत्या.चौकशी झाल्यास आपल्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात अशी भीती ज्यांच्या काळात गैरप्रकार झाले, त्यांना आहे. या पार्श्वभूमीवर म्हणून तत्कालीन सरपंचांनी मागील १३ महिन्यात ऋतुजा आनंदगावकर यांनी चार्ज घेतल्यापासून अनेक वेळा त्यांच्या विरोधात आंदोलने केली.याबाबत आनंदगावकर यांनी जिल्हा परिषदेकडे अनेक तक्र ारी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी १२ मार्च रोजी चौकशी समिती नेमली. परंतु ही समिती अद्याप चौकशीसाठी गावात आलीच नाही.या ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा योजनेसाठी ५० लक्ष रु पये खर्च झाले होते. तर आता आजी माजी सरपंचाच्या वादात चौदाव्या वित्त आयोगातून आलेला २१ लक्ष रु पयांचा निधी मागील एक वर्षापासून धूळ खात पडून आहे. यामुळे गावचा विकास खुंटला आहे.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन