शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

मंजरथकरांचे टॉवरवर ‘शोले’स्टाईल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:42 IST

तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले.

ठळक मुद्देआजी- माजी गटांचा वाद : गावाचा विकास खुंटला

माजलगाव : तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले.मंजरथ येथील सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या परराज्यात नोकरी करत असून, ग्रामपंचायतीकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीला ग्रामसेवकदेखील नाही. यामुळे येथील नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. सरपंच व ग्रामसेवकाअभावी येथून कुठलेच काम होत नाही. याविरोधात गावकºयांच्या वतीने नेहमीच उपोषणे, आंदोलने करण्यात आलेली आहेत. परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गावकºयांच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यता आले. यावेळी रमाई, पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे करा, गावातील स्वच्छता करा, गावाला पाणीपुरवठा व्यवस्थित करा, याठिकाणी ग्रामसेवकाची नियुक्ती करा आदी मागण्या ग्रामस्थांनी लावून धरल्या.पोलिसांच्या मध्यस्तीनंतर गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण यांनी तात्काळ ग्रामसेवक नियुक्त करण्याचे आश्वासन दिले.१३ महिन्यांत अनेक वेळा विरोधात आंदोलनेमाजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील ग्रामपंचायत ही सधन ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मागील पाच वर्षांपूर्वी येथील सरपंच व सदस्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विद्यमान सरपंच ऋतुजा आनंदगावकर यांनी करत यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रारीदेखील केल्या होत्या.चौकशी झाल्यास आपल्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात अशी भीती ज्यांच्या काळात गैरप्रकार झाले, त्यांना आहे. या पार्श्वभूमीवर म्हणून तत्कालीन सरपंचांनी मागील १३ महिन्यात ऋतुजा आनंदगावकर यांनी चार्ज घेतल्यापासून अनेक वेळा त्यांच्या विरोधात आंदोलने केली.याबाबत आनंदगावकर यांनी जिल्हा परिषदेकडे अनेक तक्र ारी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी १२ मार्च रोजी चौकशी समिती नेमली. परंतु ही समिती अद्याप चौकशीसाठी गावात आलीच नाही.या ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा योजनेसाठी ५० लक्ष रु पये खर्च झाले होते. तर आता आजी माजी सरपंचाच्या वादात चौदाव्या वित्त आयोगातून आलेला २१ लक्ष रु पयांचा निधी मागील एक वर्षापासून धूळ खात पडून आहे. यामुळे गावचा विकास खुंटला आहे.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन