शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा भरल्या, मात्र पोहोचायला बसच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक गावांमध्ये अद्याप राज्यमार्ग परिवहन महामंडळाची बस पोहोचलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक गावांमध्ये अद्याप राज्यमार्ग परिवहन महामंडळाची बस पोहोचलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घेत शाळा गाठावी लागत आहे. यात त्यांचे हाल होणार असून, बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.

जिल्ह्यात १ हजार ६३९ शाळा आहेत. यात पाचवी ते आठवीपर्यंत १ लाख ८५ हजार ८३५ एवढे विद्यार्थी असून, नववी ते बारावीपर्यंत ७८ हजार ६३० विद्यार्थी आहेत. आधी नववीपासून आणि आता पाचवीपासून शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात काही गावांत अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आजही बस नसल्याचे चित्र आहे. लाॅकडाऊननंतर हळूहळू बसची चाकं पूर्णपणे धावू लागली असले तरी जिल्ह्यात १०० टक्के बसेस अद्याप पूर्ण क्षमतेने धावत नाहीत. याचा फटका सामान्यांसह आता विद्यार्थ्यांनाही बसणार आहे. विभागीय नियंत्रक बी. एस. जगनोर हे संवेदनशील असून विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, यावर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

मानव विकासच्या बसेस आजपासून धावणार

जिल्ह्यात मानव विकासच्या सात बसेस आहेत. ग्रामीण भागासह वाड्या, वस्त्यांवरील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी या बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. सध्यातरी बीड जिल्ह्यातील सातही बस या धारूर आगारांतर्गत धावत आहेत. धारूरसह वडवणी व शेजारच्या गावांतील विद्यार्थी शाळेवर पोहोचविण्याचे काम त्या करतात. दररोज ९७० किमी अंतर त्या पार करतात. परंतु इतर गावांमध्येही बसेस सुरू करण्याबाबत कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून जोर धरू लागली आहे.

गावांत, वाड्यावर बस नाही

लॉकडाऊन उघडल्यानंतर बसेस काही प्रमाणात धावू लागल्या आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावांत, वाड्यांवर बस पोहोचलेली नाही. त्यामुळे या भागातील लोक आजही जीप, रिक्षा आदी खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करत आहेत. यात आर्थिक भुर्दंडासह अपघातास निमंत्रण मिळत आहे.

बसेस सुरू कराव्यात, अन्यथा आंदोल करू

लॉकडाऊन उघडल्यानंतरही आजही अनेक गावांत रापमची बस पोहोचलेली नाही. ही गंभीर बाब आहे. यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. यावर रापमने वेळीच कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू.

- राहुल वाईककर, संभाजी ब्रिगेड, बीड

विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, यासाठी रापमने उपाययोजना करण्याची गरज आहे. शिक्षणमंत्री व परिवहनमंत्र्यांना माझी विनंती असेल, की त्यांनी या बसेस लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी.

-सुजाता मोराळे, सामाजिक कार्यकर्त्या

आगारप्रमुखांचा कोट

जिल्ह्यात मानव विकासच्या सात बसेस असून, सोमवारपासून त्या धावतील. इतर गावांतही मागणीप्रमाणे बसेस सुरू केल्या जात आहेत. सर्व गावांत बसेस सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

- एस. बी. पडवळ

विभागीय वाहतूक अधिकारी, बीड