शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

बीडमध्ये १६२ पैकी १५७ ग्रा.पं.साठी शांततेत मतदान; पाच बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:49 AM

पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी बीड जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात होता.

जानेवारी व फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार दूसºया टप्प्यात जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत १६४ सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे १४८८ सरपंच व सदस्यांच्या निवडीसाठी प्रत्यक्ष मतदान मंगळवारी झाले. सकाळी सात वाजेपासूनच केंद्रांवर हक्क बजावण्यासाठी मतदारांची गर्दी दिसून आली. दरम्यासन, या निवडणुकीत चार ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. तर दोन ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत.नेकनूरमध्ये गोंधळबीड तालुक्यातील नेकनुर येथील मतदान केंद्रावरील एका मशीनमध्ये सकाळी बिघाड झाली होती. त्यानंतर तात्काळ निवडणूक विभागाच्या अधिकाºयांनी धाव घेत यंत्र दुरूस्त करून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. दरम्यानच्या काळात थोडा गोंधळ उडाला होता. तसेच धारुर तालुक्यातील गोपाळपूर येथे संथगतीने प्रक्रिया चालल्याने रात्री ७ वाजेपर्यंत मतदान सुरू होते तर भोगलवाडी, हिंगणा येथे मतदान यंत्र बंद पडले होते. तसेच आडसमध्येही उशिरापर्यंत मतदान सुरू होते.आष्टीत जास्तमतदानआष्टी तालुक्यात चार ग्रा.पं.साठी सार्वाधिक ८१ टक्के (दुपारी साडेतीन पर्यंत) मतदान झाले. तर धारूर तालुक्यातील १६ ग्रा.पं.साठी केवळ ६१ टक्के मतदान झाले होते. एकूण ६९.३७ टक्के एवढे मतदान झाले होते.तरूणांचा उत्साहआपला हक्क बजावण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पहिल्यांदाच मतदान करणाºया तरूणांची गर्दी दिसून आली. त्यांचा उत्साह चेहºयावर स्पष्ट दिसत होता. तर वृद्धांनीही नातेवाईकांचा आधार घेत मतदान केले.चोख बंदोबस्तकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस अधिकारी प्रत्येक केंद्राचा आढावा घेत होते.