शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

हंगामी वसतिगृहांना मुहूर्त लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:24 IST

ऊस तोडणीसाठी राज्यात व परराज्यात स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठीचे हंगामी वसतिगृह नोव्हेंबरचे २७ दिवस उलटुनही सुरु झालेले नाहीत. प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई, वसतिगृह सुरु करण्यास उदासीनता, आंतरजिल्हा बदली प्रकरणातील कार्यवाही आणि दुष्काळी स्थिती या कारणांमुळे वसतिगृहांना मुहूर्त मिळालेला नाही.

ठळक मुद्दे६६३ प्रस्ताव : १ डिसेंबरपासून मंजुरीची शक्यता, स्थलांतर रोखलेला आकडा गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ऊस तोडणीसाठी राज्यात व परराज्यात स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठीचे हंगामी वसतिगृह नोव्हेंबरचे २७ दिवस उलटुनही सुरु झालेले नाहीत. प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई, वसतिगृह सुरु करण्यास उदासीनता, आंतरजिल्हा बदली प्रकरणातील कार्यवाही आणि दुष्काळी स्थिती या कारणांमुळे वसतिगृहांना मुहूर्त मिळालेला नाही.ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात जिल्ह्यातून जवळपास सात लाख मजूर ऊस तोडणीसाठी जातात. स्थलांतरामुळे त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक हेळसांड होऊ नये व शिक्षणाच्या प्रवाहात ते टिकून राहावे म्हणून आधीच्या सर्व शिक्षा व सध्याच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृहाची योजना आहे. या योजनेंतर्गत शाळा व्यवस्थापन समित्यांच्या वतीने स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांसाठी वसतिगृह सुरु केले जातात. सह महिन्यांसाठी ही योजना राबविली जाते. वसतिगृहातील नोंदीत एका विद्यार्थ्यासाठी शासनाकडून ८ हजार ५०० रुपये अनुदान मिळते. यंदा अल्प पावसामुळे खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला तर रबीच्या पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. यातच ग्रामीण भागातील सर्व जलस्त्रोत कोरडे आहेत. जिथे पाणी आहे, तेथील पाणीपातळी कमी होत चालली आहे. या परिस्थितीमुळे संभाव्य संकट लक्षात घेत यंदा उसतोडीसाठी जाणाºया मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक मजुरांनी आपल्या पशुधनासह स्थलांतर केले आहे. यंदा २६ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुटी होती. सुटीमुळे मुले पालकांसोबत गेली, आता परतल्यानंतर वसतिगृह सुरु होतील अशी अपेक्षा होती.मागील आठवड्यापासून आंतरजिल्हा बदली प्रकरणातील कामकाजामुळे तसेच अधिवेशनामुळे आणि न्यायालयाच्या तारखांमुळे अधिकाºयांना व्यस्त रहावे लागले. त्यामुळे हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावांची दोन दिवसांमध्ये पडताळणी होण्याची शक्यता आहे. १ डिसेंबरपासून वसतिगृह सुरु होतील असा अंदाज आहे.धान्य महागले : अनुदानात वाढीची गरजहंगामी वसतिगृहासाठीच्या योजनेत प्रती मूल ८ हजार ५०० रुपे दिले जातात. यात जेवणाचा दर्जा राखण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. दुष्काळजन्य स्थितीमुळे मागील काही दिवसातच ज्वारी, गहू, बाजरीचे दर कडाडले आहेत. त्यामुळे महागडे धान्य खरेदी करावे लागणार आहे. तसेच इतर वस्तुंच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याने मिळणारे अनुदान आर्थिकदृष्ट्या परवडेल काय? या विचारात अनेक ठिकाणचे प्रस्ताव अद्याप आलेले नाहीत. तयमुळे महागाईचा विचार करुन प्रती मूल अनुदानात वाढ करण्याची गरज आहे.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखाने